शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

सॅल्युट ! घरासमोर मांडव सजला, सनई चौघडे वाजू लागले, तरीही 'तो' सीमारेषेवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 18:05 IST

मंडी येथील रहिवासी असलेल्या सुनिलचे गुरुवारी लग्न होणार होते.

श्रीनगर - सैन्यातील जवानांना कुटुंबापासून दूर रहावे लागते. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवानांना कधी-कधी घरच्यांना बोलायलाही मिळत नाही. मात्र, सैन्यातील एका जवानाला त्याच्या लग्नादिवशीही कर्तव्य बजावावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे. देशसेवेसाठी त्याग आणि समर्पण हे जवानांच्या रक्तातच भिनलेल असतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

हिमाचलच्या मंडी येथील मूळ रहिवासी असलेला हा जवान काश्मीरमधील मोठ्या बर्फवृष्टीमुळे तेथून बाहेरच पडू शकला नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वर्तमानपत्रातील बातमी ट्विट करत भारतीय सैन्याच्या जवानांच्या त्याग अन् समर्पणाचं वर्णन केलंय. आधी लगीन कोंढण्याचं म्हणणाऱ्या तानाजीचीच आठवण ही बातमी वाचून झाल्याशिवाय राहणार नाही. सैन्य दलानेही ट्विटरवरुन अशीच प्रतिकिया देत, सैन्यातील जवानांसाठी देश सर्वप्रथम नंतर जीवन त्याची वाट बघेल, असे म्हटले आहे. 

मंडी येथील रहिवासी असलेल्या सुनिलचे गुरुवारी लग्न होणार होते. मात्र, गेल्या 2 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे तो काश्मीरमध्येच अडकून पडला. सुनिलच्या लग्नाची सर्व तयारी झाली होती, बुधवारी रितीरिवाजाप्रमाणे सगळे कार्यक्रमही पार पडले. आता, गुरुवारी लडभडोल येथील एका गावासाठी त्याची वरातही निघणार होती. दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या घराची मोठी सजावट केली होती. सनई-चौघडे वाजत होते, संगीत अन् नातेवाईकांची धूम होती. विशेष म्हणजे 1 जानेवारीपासून सुनिलच्या सुट्ट्याही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे, बांदीपोरा येथील ट्रांजिट कॅम्पवर तो पोहोचला होता. मात्र, खराब हवामानामुळे सर्वच रस्ते बंद होते. विमानही उड्डाण करू शकत नव्हते. त्यामुळे सुनिलने फोनवरुनच कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि आपण लग्नाला येऊ शकत नसल्याचे सांगितले. सुनिलच्या फोनमुळे दोन्ही कुटुंबीयांची निराशा झाली पण, देशसेवा बजावणाऱ्या सुनिलचा आम्हाला गर्व असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं.     

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानmarriageलग्नJammu Kashmirजम्मू-काश्मीरSnowfallबर्फवृष्टी