शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

'देशाला हिंदू पाकिस्तान बनविण्याचा प्रयत्न', जावेद अख्तर यांची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 11:28 IST

तुम्ही एका भारतीय व्यक्तीला त्याचे राष्ट्रीयत्व कसंकाय मागू शकता. आदिवासी, दलित आणि गरीबांकडे पुरावा मिळाला नाही तर त्यांना सरकार कुठं पाठवणार. या लोकांनी सरकारला मतदान केले आहे. त्यावेळी त्यांना नागरिकत्व विचारले नाही, असं सांगताना अख्तर यांनी देशातील 10-12 कोटी निर्वासितांसाठी सरकारने व्यवस्था केली का, असा सवाल पस्थित केला. 

नवी दिल्ली - गीतकार जावेद अख्तर आपल्या स्पष्टोक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत.  काही दिवसांपूर्वीच अख्तर यांनी नागरिकत्व कायद्यावरून विद्यमान सरकारवर टीकास्त्र सोडले होते. आता अख्तर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाना साधला असून देशाला हिंदू पाकिस्तान करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रसिद्ध रंगकर्मी सफदर हाश्मी यांच्या 31व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अख्तर बोलत होते. देशातील नागरिकांना धर्माच्या आधारावर विभागले जात आहे. गर्वाने सांगा आम्ही हिंदू, अशा घोषणा देण्यास भाग पाडले जात आहे. मात्र यामुळे समस्यांचे सुटणार नाहीत. शरणार्थींना धर्म नसतो. त्यामुळे देशात असा कायदा असावा ज्यामध्ये धर्मिक भेद होऊ नये. 

तुम्ही एका भारतीय व्यक्तीला त्याचे राष्ट्रीयत्व कसंकाय मागू शकता. आदिवासी, दलित आणि गरीबांकडे पुरावा मिळाला नाही तर त्यांना सरकार कुठं पाठवणार. या लोकांनी सरकारला मतदान केले आहे. त्यावेळी त्यांना नागरिकत्व विचारले नाही, असं सांगताना अख्तर यांनी देशातील 10-12 कोटी निर्वासितांसाठी सरकारने व्यवस्था केली का, असा सवाल पस्थित केला. 

याआधी नागरिकता कायद्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनानंतर ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी अख्तर यांनी या अटकेचा विरोध केला होता. विरोध दडपण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.