शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

'देशाला हिंदू पाकिस्तान बनविण्याचा प्रयत्न', जावेद अख्तर यांची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 11:28 IST

तुम्ही एका भारतीय व्यक्तीला त्याचे राष्ट्रीयत्व कसंकाय मागू शकता. आदिवासी, दलित आणि गरीबांकडे पुरावा मिळाला नाही तर त्यांना सरकार कुठं पाठवणार. या लोकांनी सरकारला मतदान केले आहे. त्यावेळी त्यांना नागरिकत्व विचारले नाही, असं सांगताना अख्तर यांनी देशातील 10-12 कोटी निर्वासितांसाठी सरकारने व्यवस्था केली का, असा सवाल पस्थित केला. 

नवी दिल्ली - गीतकार जावेद अख्तर आपल्या स्पष्टोक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत.  काही दिवसांपूर्वीच अख्तर यांनी नागरिकत्व कायद्यावरून विद्यमान सरकारवर टीकास्त्र सोडले होते. आता अख्तर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाना साधला असून देशाला हिंदू पाकिस्तान करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रसिद्ध रंगकर्मी सफदर हाश्मी यांच्या 31व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अख्तर बोलत होते. देशातील नागरिकांना धर्माच्या आधारावर विभागले जात आहे. गर्वाने सांगा आम्ही हिंदू, अशा घोषणा देण्यास भाग पाडले जात आहे. मात्र यामुळे समस्यांचे सुटणार नाहीत. शरणार्थींना धर्म नसतो. त्यामुळे देशात असा कायदा असावा ज्यामध्ये धर्मिक भेद होऊ नये. 

तुम्ही एका भारतीय व्यक्तीला त्याचे राष्ट्रीयत्व कसंकाय मागू शकता. आदिवासी, दलित आणि गरीबांकडे पुरावा मिळाला नाही तर त्यांना सरकार कुठं पाठवणार. या लोकांनी सरकारला मतदान केले आहे. त्यावेळी त्यांना नागरिकत्व विचारले नाही, असं सांगताना अख्तर यांनी देशातील 10-12 कोटी निर्वासितांसाठी सरकारने व्यवस्था केली का, असा सवाल पस्थित केला. 

याआधी नागरिकता कायद्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनानंतर ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी अख्तर यांनी या अटकेचा विरोध केला होता. विरोध दडपण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.