शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जन धन इफेक्ट - दारु, तंबाखूचा खर्च कमी झाला, बचत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनांवर सध्या टीकेचा भडीमार होत असला तरी, पंतप्रधान जन धन योजनेचे काही सकारात्मक परिणामही समोर आले आहेत.

ठळक मुद्देजेव्हा ही योजना लाँच झाली तेव्हा पैशांचा ओघ वाढणार असल्याने ग्रामीण भागात महागाई भडकण्याची भिती व्यक्त झाली होती. किरकोळ महागाई दराच्या आकडयांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनांवर सध्या टीकेचा भडीमार होत असला तरी, पंतप्रधान जन धन योजनेचे काही सकारात्मक परिणामही समोर आले आहेत. या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील जनतेला बँकेशी जोडण्यासाठी त्यांची बँक खाती उघडण्यात आली. या योजनेतंर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये सेव्हींगचे प्रमाण वाढले असून, दारु आणि तंबाखूवरचा खर्च कमी झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

जेव्हा ही योजना लाँच झाली तेव्हा पैशांचा ओघ वाढणार असल्याने ग्रामीण भागात महागाई भडकण्याची भिती व्यक्त झाली होती. पण प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही असे अहवालात म्हटले आहे. ज्या राज्यांच्या ग्रामीण भागात 50 टक्क्याहून अधिक जन धन खाती आहेत तिथे महागाईचा दर घटला आहे. किरकोळ महागाई दराच्या आकडयांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला आहे. 

जन धन योजनेतंर्गत देशभरात 30 कोटींपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली आहेत. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातील नोटाबंदीनंतर बहुतांश बँक खाती उघडण्यात आली. जन धन अंतर्गत दहा राज्यांमध्ये 23 कोटी बँक खाती आहेत. यात उत्तर प्रदेश 4.7 कोटींसह अव्वल स्थानावर आहे. त्याखालोखाल 3.2 कोटीसह बिहार दुस-या आणि  पश्चिम बंगाल 2.9 कोटी बँक खात्यांसह तिस-या स्थानावर आहे. 

जन धन योजनेचा ग्रामीण आणि शहरी ग्राहक प्राईस इंडेक्सवर काय परिणाम झाला त्याचे राज्यनिहाय विश्लेषण करण्यात आले. या वर्षाच्या अखेरीस हा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध होऊ शकतो. एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष आणि त्यांच्या टीमने हा अहवाल तयार केला आहे. नोटाबंदीनंतर खर्च करण्याचे प्रमाण कमी झाले. ऑक्टोंबर 2016 नंतर बिहार, पश्चिमबंगाल, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांमध्ये कैटुंबिक वैद्यकीय खर्चामध्ये वाढ झाली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbankबँक