शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जन धन इफेक्ट - दारु, तंबाखूचा खर्च कमी झाला, बचत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनांवर सध्या टीकेचा भडीमार होत असला तरी, पंतप्रधान जन धन योजनेचे काही सकारात्मक परिणामही समोर आले आहेत.

ठळक मुद्देजेव्हा ही योजना लाँच झाली तेव्हा पैशांचा ओघ वाढणार असल्याने ग्रामीण भागात महागाई भडकण्याची भिती व्यक्त झाली होती. किरकोळ महागाई दराच्या आकडयांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनांवर सध्या टीकेचा भडीमार होत असला तरी, पंतप्रधान जन धन योजनेचे काही सकारात्मक परिणामही समोर आले आहेत. या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील जनतेला बँकेशी जोडण्यासाठी त्यांची बँक खाती उघडण्यात आली. या योजनेतंर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये सेव्हींगचे प्रमाण वाढले असून, दारु आणि तंबाखूवरचा खर्च कमी झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

जेव्हा ही योजना लाँच झाली तेव्हा पैशांचा ओघ वाढणार असल्याने ग्रामीण भागात महागाई भडकण्याची भिती व्यक्त झाली होती. पण प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही असे अहवालात म्हटले आहे. ज्या राज्यांच्या ग्रामीण भागात 50 टक्क्याहून अधिक जन धन खाती आहेत तिथे महागाईचा दर घटला आहे. किरकोळ महागाई दराच्या आकडयांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला आहे. 

जन धन योजनेतंर्गत देशभरात 30 कोटींपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली आहेत. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातील नोटाबंदीनंतर बहुतांश बँक खाती उघडण्यात आली. जन धन अंतर्गत दहा राज्यांमध्ये 23 कोटी बँक खाती आहेत. यात उत्तर प्रदेश 4.7 कोटींसह अव्वल स्थानावर आहे. त्याखालोखाल 3.2 कोटीसह बिहार दुस-या आणि  पश्चिम बंगाल 2.9 कोटी बँक खात्यांसह तिस-या स्थानावर आहे. 

जन धन योजनेचा ग्रामीण आणि शहरी ग्राहक प्राईस इंडेक्सवर काय परिणाम झाला त्याचे राज्यनिहाय विश्लेषण करण्यात आले. या वर्षाच्या अखेरीस हा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध होऊ शकतो. एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष आणि त्यांच्या टीमने हा अहवाल तयार केला आहे. नोटाबंदीनंतर खर्च करण्याचे प्रमाण कमी झाले. ऑक्टोंबर 2016 नंतर बिहार, पश्चिमबंगाल, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांमध्ये कैटुंबिक वैद्यकीय खर्चामध्ये वाढ झाली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbankबँक