शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Jammu and Kashmir : बांदीपोरा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 11:41 IST

जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात गुरुवारी सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. गुरुवारी ( 30 ऑगस्ट) सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलातील जवानांनी काही दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. 

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी बांदीपोराच्या हाजिन परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारदेखील केला. यावेळी जवानही दहशतवाद्यांच्या गोळीबारला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत.  

बुधवारी (29 ऑगस्ट) जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा रक्षकांनी हिजबुल या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हिजबुल संघटनेचा अल्ताफ अहमद डार उर्फ अल्ताफ कचरू आणि त्याचा साथीदार उमर राशिद या दोघांना जवानांनी ठार केले. या दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर भ्याड हल्ला केला.

जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 4 पोलीस शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावून पळ काढला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि लष्काराचे जवान दाखल झाले. जवानांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली होती. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय लष्करterroristदहशतवादी