शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:25 IST

Jammu Kashmir: आज पंतप्रधान मोदींनी चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले.

Jammu Kashmir: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझ जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले. त्यानंतर, कटरा येथे काश्मीरच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदीं तोंडभरुन कौतुक केले. 

'ब्रिटिशांनाही जे काम जमले नाही...'ओमर अब्दुल्ला म्हणाले, चिनाब पूल प्रकल्प पूर्ण होताना पाहणे हे प्रत्येकाचे स्वप्न होते, ते पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. जे काम ब्रिटिशांनाही जमले नाही, ते काम आपल्या पंतप्रधानांनी करुन दाखवले आहे. जेव्हा हा प्रकल्प सुरू झाला, तेव्हा मी आठवीच्या वर्गात होतो. आता मी ५५ वर्षांचा आहे, इतक्या वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.

अटलबिजारी वाजपेयींचाही उल्लेख

यावेळी अब्दुल्लांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेटी यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, आज मी माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे नाव घेतले नाही, तर योग्य ठरणार नाही. त्यांनी या प्रकल्पाला त्याकाळी राष्ट्रीय महत्व मिळवून दिले आणि यासाठी भरगोस निधी दिला. राज्यातील जनतेने अनेक दशकांपूर्वी हे स्वप्न पाहिले होते. या प्रकल्पाचा जम्मू-काश्मीरला खूप फायदा होईल. चिनाब पूल राज्याच्या विकासाला गती देईल. यामुळे राज्याची प्रगती होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा

ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, या प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना, विशेषतः सफरचंदांचा व्यापार करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. आता काश्मीरमध्ये पिकणारे सफरचंद देशाच्या विविध भागात सहज पोहोचू शकतील, ज्यामुळे राज्याची आर्थिक स्थितीही सुधारेल. यामुळे केवळ उत्पन्न वाढणार नाही तर तरुणांना रोजगारही मिळेल.

पूर्ण राज्याची मागणी... मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, २०१४ मध्ये कटरा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाला या मंचावर चार लोक उपस्थित होते. त्यावेळी तुम्ही पहिल्यांदाच पंतप्रधान झालात. मनोज सिन्हा रेल्वे राज्यमंत्री होते आणि मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. आज मनोज सिन्हा उपराज्यपाल आहेत, म्हणजेच त्यांना पदोन्नती मिळाली आहे. पण मी आता राज्याचा नाही, तर एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री झालो आहे, म्हणजेच मला पदावनती मिळाली आहे. मला विश्वास आहे की ही परिस्थिती लवकरच बदलेल आणि तुमच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेल.

लाखो लोकांचे स्वप्न पूर्णयावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला चिनाब पूल आणि अंजी पूल उद्घाटन करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. जम्मू-काश्मीरला दोन नवीन गाड्यादेखील मिळत आहेत. या विकासासाठी मी राज्यातील नागरिकांचे अभिनंदन करतो. रेल्वे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न पाहत अनेक पिढ्या येथे गेल्या. आज लाखो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीOmar Abdullahउमर अब्दुल्ला