शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'सैन्यात जाऊन वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन, शंभर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करीन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 11:54 IST

वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं अंशने ठरवलं आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दहशतवादी व लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत जवान निलेश सिंह यांना वीरमरण आलं. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या नगरी गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. संपूर्ण गाव निलेश सिंह यांच्या जाण्याने दुःखात आहे. पण निलेश यांचा 10 वर्षाचा मुलगा अंशने निर्धार केला आहे. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं अंशने ठरवलं आहे .'मोठा होऊन मी सैन्यात जाणार वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार. सैन्यात गेल्यावर शंभर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करणार, असा निर्धार अंशने केला आहे. 

नगरी गावात राहणारे शहीद जवान निलेश सिंह हे जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये तैनात होते. रविवारी झालेल्या चकमकीत निलेश यांना वीरमरण आलं. निलेश यांच्या जाण्याने त्यांचे वडील रामप्रसाद, आई उषा तसंच पत्नी व मुलाची परिस्थिती दुःखाने अतिशय वाईट झाली आहे. निलेश यांचा मुलगा अंश जरी वडील जाण्याच्या दुःखात असला तरी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा राग त्याच्या डोळ्यात आहे. पत्रकारांसोबत बोलताना मी दहशतवाद्यांना अजिबात घाबरणार नाही, वडिलांच्या मारेक-यांना मी सोडणार नाही, प्रत्येकाचा बदला घेईन असं तो म्हणाला.  वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अंशने केलेला निर्धार पाहून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच सुखद धक्का बसला. इतकंच नाही तर तेथे उपस्थित असलेले लष्कराचे अधिकारीही आश्चर्यचकीत झाले.

दरम्यान, निलेश यांच्या वडिलांनी त्यांचा दुसरा मुलगा मुकेशसाठी लष्करात नोकरीची मागणी केली आहे. जानेवारी महिन्यात निलेश यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये झाली होती.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी