शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir Target Killing: कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून बँक मॅनेजरची हत्या, SBI नं पुढे केला मदतीचा हात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 22:39 IST

Jammu-Kashmir Target Killing: यासंदर्भात, एसबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत, विजय कुमार यांच्या कुटुंबाला एसबीआय आर्थिक मदतीशिवाय, इतर प्रकारेही मदद करेल, असे म्हटले आहे. 

राजस्थानातील एका बँक मॅनेजरची जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केली. काश्मीर खोऱ्यात 1 मेपासून मुस्लिमेतर सरकारी कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांकडून झालेली ही तिसरी हत्या आहे. यानंतर, आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) संबंधित मॅनेजरच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. यासंदर्भात, एसबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत, विजय कुमार यांच्या कुटुंबाला एसबीआय आर्थिक मदतीशिवाय, इतर प्रकारेही मदद करेल, असे म्हटले आहे. 

2019 मध्ये जॉईन केली होती बँक -SBI ने म्हटले आहे, की विजय कुमार हे SBI कडून स्पॉन्सर करण्यात येत असलेल्या Ellaqie Dehati Bank (EDB) मध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते. दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते केवळ 29 वर्षांचे होते आणि मार्च 2019 मध्येच ईडीबीमध्ये जॉईन झाले होते. 

याच बरोबर, 'विजय कुमार हे देशातील विविधा भागांतील कर्मचाऱ्यांपैकी एक होते. जे काश्मीर आणि इतरही काही खडतर भागांत, नागरिकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी काम करतात. एसबीआय ईडीबीला स्पॉन्सर करते, यामुळे बँक आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि कल्यानासाठी वचनबद्ध आहे. यात काश्मिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामुळे, ईडीबीकडून त्यांच्या कुटुंबाला तत्काळ वित्तीय आणि इतर प्रकारची मदतही केली जाईल,' असे एसबीआयने म्हटले आहे.

1 मे पासून आतापर्यंत 8 'टार्गेट किलिंग' -जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव नाही. जम्मू-काश्मीरमध्ये 1 मे ते 2 जून या कालावधीत 8 जणांना टार्गेट करण्यात आले आहे. खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगवरून विरोधक मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. कुलगाममध्ये एका काश्मिरी पंडित  शिक्षिकेच्या हत्येनंतर दोन दिवसांनी दहशतवाद्यांनी विजय कुमारची हत्या केली. यापूर्वी 31 मे रोजी जम्मूमध्ये रजनी बाला (36) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. कुलगामच्या गोपालपुरा जिल्ह्यातील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या.

मे महिन्यात दहशतवाद्यांनी 7 टार्गेट किलिंग केल्या. सर्वात आधी 12 मे रोजी दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताची हत्या केली. यानंतर 25 मे रोजी कलाकार अमरीन भट्ट यांचीही हत्या करण्यात आली. याशिवाय तीन ऑफ ड्युटी पोलीसांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती. 

टॅग्स :SBIएसबीआयJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादbankबँक