शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 18:26 IST

Rajnath Singh And Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्लांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्लांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. सुरक्षेत कोणतीही कमतरता नाही. "सुरक्षा दल दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता हल्ल्यांचं प्रमाण कमी झालं आहे. सुरक्षा दल सतर्क आहेत आणि अशी परिस्थिती येईल जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया पूर्णपणे संपतील" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 

राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. या भागात सुरक्षा दल सतत सक्रिय आहेत. २९ ऑक्टोबर रोजी सुरक्षा दलांनी अखनूरमध्ये एका उच्चस्तरीय चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या चकमकींवरून हे स्पष्ट होतं की, सुरक्षा दल दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करत आहेत आणि त्या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असताना राजनाथ सिंह यांनी यावर भाष्य केलं आहे. श्रीनगरच्या खानयार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानयार भागात सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली होती, ज्यामध्ये गोळीबार झाला होता.

खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या चकमक सुरू आहेत. अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले. ज्या घरात दहशतवादी लपले होते, तिथे मोठा स्फोट झाला आहे. यानंतर घराला भीषण आग लागली. परिसरात धुराचे लोट दिसत आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी