शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Jammu & Kashmir: ...म्हणून इतिहास घडत असतानाही मोदी लोकसभेत शांत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 06:13 IST

याआधी महत्त्वाची विधेयकं संमत होत असताना मोदी अनेकदा बाक वाजवताना दिसले आहेत

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द करणारी विधेयके मंगळवारी लोकसभेत संमत होत असल्याचा इतिहास घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाक का वाजवला नाही याचे रहस्य आता उलगडत आहे.सोमवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक सात लोकनायक मार्गावर घेण्यात आली. परंतु, मोदी नेहमी जसे सुहास्य वदनाने असतात तसे ते या बैठकीत नव्हते याचे त्यांच्या सहकारी मंत्र्यांनाही काहीसे आश्चर्य वाटले. मोदी जेव्हा मंगळवारी सायंकाळी शेवटच्या तासात लोकसभेत आले तेव्हा ३७० खासदारांनी त्यांचे उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळीही ते ना हसले ना ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त होत असताना त्यात सहभागी झाले.

गृहमंत्री अमित शहा यांना त्यांचे भाषण सुरू असताना वारंवार दाद मिळत होती. तरीही नरेंद्र मोदी यांनी आपण तणावात असल्याचे भाव दर्शवले. मोदी हे नेहमी असतात त्या व्यक्तित्त्वाचे या ऐतिहासिक क्षणाला नव्हते. गेल्या महिन्यात संसदेत अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण सादर करीत होत्या तेव्हा मोदी यांनी १०० वेळा बाक वाजवला होता. ऐतिहासिक ठरलेले वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक लोकसभेत संमत झाले तेव्हा मोदी हे बाक वाजवत होते. परंतु, जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयके संमत झाली तेव्हा एकदाही त्यांनी बाक वाजवला नाही. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना त्यांनी मोठा प्रवास पुढे करायचा आहे त्यामुळे कृपा करून मोठा आनंद आताच व्यक्त करू नका, असेही सांगितले नाही. 

सुरक्षेवरील मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयके पुढे जाऊ दिली केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्हे. मोदी हे सीसीएसच्या बैठकीनंतर शहा यांच्यासोबत मंत्रिमंडळाच्या खोलीत आले. मंत्रिमंडळाची संमती मागण्यात आली नाही. त्याऐवजी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी मोदी निर्णय जाहीर करीत असताना वारंवार बाके वाजवली.प्रकाशझोत अमित शहांवरपक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितल्यानुसार जम्मू आणि काश्मीरची ही विधेयके याच सत्रात संमत झाली पाहिजेत यावर मोदी ठाम होते.त्यासाठीच त्यांनी अधिवेशन कामकाजाचे पूर्ण १० दिवस वाढवलेही होते. त्याचे श्रेय न घेता मोदी यांनी मंत्रिमंडळातील त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अमित शहा यांना आघाडीवर स्थान मिळेल, अशी व्यवस्था केली.या विधेयकांसंबंधित सगळा प्रकाशझोत शहा यांच्यावरच असावा व आपल्याकडे न यावा म्हणून मोदी यांनी चर्चेत शब्दश: एकदाही हस्तक्षेप केला नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, मोदी यांनी सोमवारी सकाळी आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत एकही भाष्य करायचे नाही, असे ठरवले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370ParliamentसंसदAmit Shahअमित शहा