शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 18:17 IST

Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये शुक्रवारी (२ मे २०२५)  झालेल्या मुसळधार पावसामुळे चिनाब नदीची पाणी पातळी वाढली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान भयभीत झाला आहे. पाकिस्तानला सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. तर आता दुसरीकडे पाकिस्तानला नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे पीओकेमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.

चिनाबची पाणी पातळी वाढली -जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये शुक्रवारी (२ मे २०२५)  झालेल्या मुसळधार पावसामुळे चिनाब नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे पाकिस्तानच्या अनेक भागांत पुराचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १ ते ६ मे दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे (४०-६० किमी/ताशी) वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी झेलमला आला होता पूरमाध्यमांतील वृत्तांनुसार, गेल्या महिन्यात (२६ एप्रिल २०२५), भारताने पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हट्टिन बाला भागात झेलम नदीत पाणी सोडले होते. यामुळे मुझफ्फराबादमध्ये अचानक मोठा पूर आला होता. यानंतर, मुझफ्फराबाद प्रशासनावर वॉटर इमर्जन्सी जाहीर करण्याची वेळ आली होती. उरी येथील अनंतनाग जिल्ह्यातून चकोठीमध्ये पाणी शिरल्याने झेलम नदीला अचानक पूर आला होता. यामुळे येथील स्थानिक लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत -पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्यासह अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तान सध्या एवढा घाबरला आहे की, तो संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेकडे भारतापासून वाचवण्याची विनंती करत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूरriverनदी