शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Jammu-Kashmir : जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 18:32 IST

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी (3 जानेवारी) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये  चकमक उडाली. या चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

ठळक मुद्देत्रालमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्माजैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्यांचा खात्माचकमकीत तीन जवानदेखील जखमी

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (3 जानेवारी) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.  पुलवामातील त्राल परिसरात ही चकमक सुरू होती. जवान आणि दहशतवादी दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू होता. या चकमकीदरम्यान, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. ठार करण्यात आलेले हे दहशतवादी 'जैश-ए-मोहम्मद' संघटनेतील असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले आहे. या चकमकीत तीन जवानदेखील जखमी झाले आहे. परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.

शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरा दाखल जवानांनी गोळीबार करत दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलं आणि तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका जवानाची प्रकृती गंभीर आहे.  

(LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान)

 

(लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटला मोठे यश! 2018 मध्ये तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान)

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात उच्छाद घालणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले. 2018मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकींमध्ये लष्कराने तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.  लष्कराने दहशतवाद्यांविरोधात उघडलेल्या व्यापक मोहिमेची माहिती देताना 15 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट म्हणाले की,''विविध सुरक्षा दलांमधील समन्वय आणि लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी दिलेल्या मोकळीकीमुळे या वर्षभरात 311 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.'' काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या तुलनेत यावर्षी अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीJaish e Mohammadजैश ए मोहम्मद