शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

Jammu-Kashmir: सरकारचा मोठा निर्णय; टार्गेट किलिंगदरम्यान सर्व हिंदू कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 18:52 IST

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगदरम्यान उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सर्व हिंदू कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता हिंदू सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहेत. दुर्गम भागात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात आणण्याची तयारी सुरू आहे. 

बदलीसह सुरक्षित निवास मिळणारउपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती, ज्यामध्ये खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगवर चर्चा करण्यात आली. त्या चर्चेनंतर असे ठरले की, जे हिंदू कर्मचारी सध्या दूरवरच्या भागात कार्यरत आहेत, त्यांची बदली केली जाईल. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासन या सर्वांना जिल्हा मुख्यालयात आणणार आहे. त्या सर्व हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित निवास व्यवस्था देण्याची जबाबदारीही प्रशासनावर राहील, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. अशा स्थितीत त्यांची केवळ बदलीच होत नाही, तर त्यांना सुरक्षित निवासाची हमीही दिली जात आहे.

काश्मिरी हिंदूंच्या हत्याकाश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचे प्रमाण वाढले असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी सातत्याने काश्मिरी पंडितांना लक्ष्य करत आहेत. सरकारी अधिकारी राहुल भट्ट यांच्या हत्येने सुरू झालेला खेळ अजून संपलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांची जम्मूला बदली करावी, या मागणीसाठी खोऱ्यातील काश्मिरी पंडितांकडून सातत्याने आंदोलन सुरू आहे. आता याच मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरकारी हिंदू कर्मचाऱ्यांना हा दिलासा दिला आहे.

हिंदू कर्मचारी निर्णयावर नाराजहिंदू कर्मचारी या निर्णयावर समाधानी नाहीत. त्यांना जम्मूमध्येच बदली हवी आहे. त्यांना घाटीत काम करायचे नाही. मोदी सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही ते करत आहेत. मात्र काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन सरकार सातत्याने देत आहे. हिंदू कर्मचाऱ्यांच्या बदलीचा निर्णयही याच दिशेने उचललेले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही महिन्यात अनेक दहशतवादी ठारखोऱ्यात काश्मिरी पंडितांवर हल्ले वाढले असल्याने प्रशासनानेही हा निर्णय घेतला आहे. राहुल भट्टशिवाय शिक्षिका रजनी बाला यांचीही हत्या करण्यात आली आहे. दहशतवादी सरपंच आणि मजुरांनाही गोळ्या घालून ठार करत आहेत. घाटीचे वातावरण बिघडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. मात्र ऑपरेशन ऑल आऊटच्या माध्यमातून भारतीय जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. यावर्षी मे महिन्यापर्यंत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला