शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत; म्हणाले, "आपल्याला समाजात बदल घडवायचाय" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 15:37 IST

राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य बाबींच्या आधारे चोवीस तास विभाजन करू शकतात. मी आपल्या पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करत नाही, आझाद यांचं वक्तव्य.

Jammu and Kashmir News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहे. रविवारी जम्मू काश्मीरमध्ये बोलताना त्यांनी असे संकेत दिले. आपल्याला समजात बदल घडवायचा असल्याचंही ते यावेळी म्हणाले. "कधी कधी मी विचार करतो, अचानक एका दिवशी तुम्हाला समजेल की मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे आणि समाज सेवा करायला सुरूवात केली आहे," असं त्यांनी नमूद केल.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर जी २३ गटाचे मुख्य सदस्य गुलाम नबी आझाद हे सातत्यानं चर्चेत आहेत. यापूर्वी आझाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली होती. तसंच त्यांची भेट घेणं ही काही बातमी नसून आपण सातत्यानं त्यांची भेट घेत अल्याचंही ते म्हणाले होते. 

याशिवाय पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतही त्यांनी वक्तव्य केलं होतं. जेव्हा निवडणूक होईल, तेव्हा पक्षाचे कार्यकर्तेच नवा अध्यक्ष कोण हे ठरवतील, असं ते म्हणाले. "राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य बाबींच्या आधारे चोवीस तास विभाजन करू शकतात. मी आपल्या पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करत नाही. नागरिकांनी समाजासोबत राहायला हवं," असंही आझाद म्हणाले. आपण सर्व एकत्र राहूनही ते काम करू शकतो. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं काय आपलं काम नाही का? असा सवालही त्यांनी केला.महात्मा गांधींचाही उल्लेखयावेळी बोलताना त्यांनी महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदू आणि धर्मनिरपेक्ष होते यावर आपला विश्वास असल्याचं म्हटलं. तसंच आझाद यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावरही भाष्य केलं. "जम्मू-काश्मीरमध्ये जे काही घडले त्याला पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार आहे, त्याचा परिणाम हिंदू, काश्मिरी पंडित, काश्मिरी मुस्लिम, डोग्रा सर्वांवर झाला आहे," असं त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादJammu Kashmirजम्मू-काश्मीरThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स