शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 18:00 IST

हल्ल्यात सहभागी असलेले मानवतेचे शत्रू असून ते नरकात कुजतील, असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. यातच माजी मुख्यमंत्री तथा जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे (जेकेएनसी) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी, या हल्ल्याचा निषेध केला असून लोकांना दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हल्ल्यात सहभागी असलेले मानवतेचे शत्रू असून ते नरकात कुजतील, असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले. यावेळी त्यांनी सिंधू पाणी करारावरही भाष्य केले.

फारुख अब्दुल्ला यांनी पोनी राईड ऑपरेटरला वाहिली श्रद्धांजली -फारुख अब्दुल्ला पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या आदिल हुसेन शाहच्या घरी पोहोचले. येथे त्यांनी आदिलच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्याला श्रद्धांजली वाहिली. आदिल पोनी राईड ऑपरेटर म्हणून काम करत होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांमध्ये आदिलचाही समावेश होता. आदिल वगळता सर्वजण पर्यटक होते.

फारुख म्हणाले, आदिल एक शहीद आहे. तो दहशतवाद्यांना घाबरून पळून गेला नाही. तो त्यांच्याशी धैर्याने लढला. हीच तर मानवता आणि काश्मिरीयत आहे.

भारताच्या कारवाईवर मौन, पाकिस्तानला टोमणे -पहलगाम हल्ल्यानंतर, भारताकडून पाकिस्तानविरुद्ध केल्या जात असलेल्या कारवाईसंदर्भात बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, "यासंदर्भात आपण काहीही बोलणार नही. कारण हा पंतप्रधानांचा अधिकार आहे." मात्र यावेळी त्यांनी पाकिस्तानला फटकारले. "पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांच्या धमक्यांवर प्रतिक्रिया देताना फारुख म्हणाले, अशा नेत्यांच्या वक्तव्यांमुळे हा प्रश्न सुटणार नाही. जर आपण त्याच्या विधानांकडे लक्ष दिले तर काश्मीर प्रगती करू शकणार नाही." असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

सिंधू पाणी करारासंदर्भात काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? -यावेळी भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या घेतलेल्या भूमिकेवरीही फारुख अब्दुल्ला यांनी भाष्य केले. ते म्हणाले, या करारात बऱ्याच काळापासून सुधारणा करणे गरजेचे होते. आपल्या नद्यांच्या पाण्यापासून आपण वंचित आहोत. नद्यांवर जलविद्युत निर्मितीच्या मदतीने हजारो मेगावॅट वीज निर्मिती करता येते. पण, पाकिस्तानच्या परवानगीशिवाय हे करता येत नाही. जम्मूला चिनाब नदीचे पाणी मिळू शकत नाही कारण करारात असे नियम आहेत.

भारत हा महात्मा गांधींचा देश -फारुख अब्दुल्ला म्हणाले, भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, आम्ही पाण्यासंदर्भात पाकिस्तानला निश्चितपणे धमकी दिली आहे. पण त्यांना मारणार नाही. आपण एवढे क्रूर नाही, जेव्हा दोन्ही देशांमध्ये सिंधू पाणी करार झाला तेव्हा जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेतले गेले नाही. यामुळे आजही लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाTerrorismदहशतवाद