शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 18:00 IST

हल्ल्यात सहभागी असलेले मानवतेचे शत्रू असून ते नरकात कुजतील, असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. यातच माजी मुख्यमंत्री तथा जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे (जेकेएनसी) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी, या हल्ल्याचा निषेध केला असून लोकांना दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हल्ल्यात सहभागी असलेले मानवतेचे शत्रू असून ते नरकात कुजतील, असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले. यावेळी त्यांनी सिंधू पाणी करारावरही भाष्य केले.

फारुख अब्दुल्ला यांनी पोनी राईड ऑपरेटरला वाहिली श्रद्धांजली -फारुख अब्दुल्ला पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या आदिल हुसेन शाहच्या घरी पोहोचले. येथे त्यांनी आदिलच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्याला श्रद्धांजली वाहिली. आदिल पोनी राईड ऑपरेटर म्हणून काम करत होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांमध्ये आदिलचाही समावेश होता. आदिल वगळता सर्वजण पर्यटक होते.

फारुख म्हणाले, आदिल एक शहीद आहे. तो दहशतवाद्यांना घाबरून पळून गेला नाही. तो त्यांच्याशी धैर्याने लढला. हीच तर मानवता आणि काश्मिरीयत आहे.

भारताच्या कारवाईवर मौन, पाकिस्तानला टोमणे -पहलगाम हल्ल्यानंतर, भारताकडून पाकिस्तानविरुद्ध केल्या जात असलेल्या कारवाईसंदर्भात बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, "यासंदर्भात आपण काहीही बोलणार नही. कारण हा पंतप्रधानांचा अधिकार आहे." मात्र यावेळी त्यांनी पाकिस्तानला फटकारले. "पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांच्या धमक्यांवर प्रतिक्रिया देताना फारुख म्हणाले, अशा नेत्यांच्या वक्तव्यांमुळे हा प्रश्न सुटणार नाही. जर आपण त्याच्या विधानांकडे लक्ष दिले तर काश्मीर प्रगती करू शकणार नाही." असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

सिंधू पाणी करारासंदर्भात काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? -यावेळी भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या घेतलेल्या भूमिकेवरीही फारुख अब्दुल्ला यांनी भाष्य केले. ते म्हणाले, या करारात बऱ्याच काळापासून सुधारणा करणे गरजेचे होते. आपल्या नद्यांच्या पाण्यापासून आपण वंचित आहोत. नद्यांवर जलविद्युत निर्मितीच्या मदतीने हजारो मेगावॅट वीज निर्मिती करता येते. पण, पाकिस्तानच्या परवानगीशिवाय हे करता येत नाही. जम्मूला चिनाब नदीचे पाणी मिळू शकत नाही कारण करारात असे नियम आहेत.

भारत हा महात्मा गांधींचा देश -फारुख अब्दुल्ला म्हणाले, भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, आम्ही पाण्यासंदर्भात पाकिस्तानला निश्चितपणे धमकी दिली आहे. पण त्यांना मारणार नाही. आपण एवढे क्रूर नाही, जेव्हा दोन्ही देशांमध्ये सिंधू पाणी करार झाला तेव्हा जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेतले गेले नाही. यामुळे आजही लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाTerrorismदहशतवाद