शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 14:51 IST

Jammu Kashmir Election 2024 : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने काश्मीरमधील अब्दुल्ला कुटुंबाचे आभार मानले पाहिजेत.'

Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद होऊ शकतो. ''अब्दुल्ला कुटुंबाने जर पाकिस्तानचा अजेंडा पाळला असता, तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग झाला असता'', असे मेहबुबा यांनी म्हटले आहे.

...तर आम्ही पाकिस्तानात असतोश्रीनगरमध्ये एका सभेत पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने काश्मीरमधील अब्दुल्ला कुटुंबाचे आभार मानले पाहिजेत. मुस्लिम बहुसंख्य असूनही शेख अब्दुल्ला यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. अन्यथा आज आम्ही स्वतंत्र झालो असतो किंवा पाकिस्तानसोबत गेलो असतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे जम्मू-काश्मीरचे देशात विलीनीकरण झाले,'' असे वक्तव्य मेहबूबा यांनी केले आहे. 

सरकार स्थापनेसाठी भाजप पीडीपीच्या दारात आलीमेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या, ''काश्मीरमध्ये जेव्हा दहशतवाद शिगेला पोहोचला होता, तेव्हा मुफ्ती कुटुंबाने काश्मीरमध्ये हुर्रियतशी करुन तरुणांना हिंसाचारापासून दूर ठेवले. पंतप्रधान मोदींना हे लक्षात असेल की, ते सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या दारात आले होते. आम्ही कितीही अटी घातल्या तरी ते आमच्यासोबत सरकार स्थापन करण्यास तयार होते. आम्ही 370 शी छेडछाड केली जाणार नाही, अशाप्रकारच्या अटी घातल्या होत्या. याशिवाय, राज्यातील अनेक रस्ते खुले होतील, AFSPA हटवला जाईल, पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांशी चर्चा केली जाईल...या सर्व अटी मान्य करुन ते आमच्यासोबत आले होते,'' असा खुलासाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीNarendra Modiनरेंद्र मोदीFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाOmar Abdullahउमर अब्दुल्ला