शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला? राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ घटना, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:54 IST

Congress MP Rahul Gandhi News: यापुढे आता लग्न करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राहुल गांधींनी सूचक शब्दांत सकारात्मक उत्तर दिले.

Congress MP Rahul Gandhi News: विविध विषयांवरून केवळ राज्यातील नाही, तर देशातील वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे १० वर्षांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी काही पक्षांनी उमेदवार यादीही जाहीर केली आहे. भाजपाच्या यादीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले, तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात जागावाटपावरून मतभेद होत असल्याची चर्चा आहे. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला, याबाबत सांगितले.

राहुल गांधी सध्या काश्मीर दौऱ्यावर असून श्रीनगरमध्ये त्यांनी काही महाविद्यालयीन युवतींशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. शिक्षणाचा संदर्भ देताना राहुल गांधी म्हणाले की, माझा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याबाबतचा अनुभव असा आहे की, जे ते तुम्हाला विद्यापीठांमध्ये शिकवतात, त्याचा वास्तव राजकारणाशी काहीही संबंध नसतो. ते कुठल्यातरी वेगळ्या जगातील शिक्षण असते आणि वास्तव राजकारण वेगळ्याच विश्वात घडत असते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला? राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ घटना

लहानपणापासूनच राजकारणात येण्याचा विचार केला होता का? असे राहुल गांधींना विचारण्यात आले. लहानपणापासून राजकारणात येण्याचा काही विचार नव्हता. तसे काही ठरवले नव्हते. पण जेव्हा बाबांचे निधन झाले, तेव्हा वाटले की राजकारणात यायला हवे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर वाटले की त्यांना जे करायचे होते, ते करण्यापासून कुणीतरी त्यांना थांबवले. मग राजकारणात येण्याचा विचार केला. तुम्हाला समोर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी बदलण्यासाठी आधी स्वत:ला बदलावे लागते, असे राहुल गांधींनी नमूद केले.

दरम्यान, यावेळी राहुल गांधींना लग्न करण्याबाबत विचारले गेले. तेव्हा, लग्नाचा दबाव? मी गेल्या २०-३० वर्षांपासून लग्नाचे दडपण लांब ठेवण्यात यशस्वी ठरलो आहे. पण मला वाटतं ती एक चांगली गोष्ट आहे. यापुढे आता लग्न करण्याचा विचार आहे का, या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, हो. म्हणजे त्यासाठी काही वेगळे नियोजन करत नाही. पण जर ते घडले तर ती एक चांगली गोष्ट आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेस