शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला? राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ घटना, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:54 IST

Congress MP Rahul Gandhi News: यापुढे आता लग्न करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राहुल गांधींनी सूचक शब्दांत सकारात्मक उत्तर दिले.

Congress MP Rahul Gandhi News: विविध विषयांवरून केवळ राज्यातील नाही, तर देशातील वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे १० वर्षांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी काही पक्षांनी उमेदवार यादीही जाहीर केली आहे. भाजपाच्या यादीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले, तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात जागावाटपावरून मतभेद होत असल्याची चर्चा आहे. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला, याबाबत सांगितले.

राहुल गांधी सध्या काश्मीर दौऱ्यावर असून श्रीनगरमध्ये त्यांनी काही महाविद्यालयीन युवतींशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. शिक्षणाचा संदर्भ देताना राहुल गांधी म्हणाले की, माझा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याबाबतचा अनुभव असा आहे की, जे ते तुम्हाला विद्यापीठांमध्ये शिकवतात, त्याचा वास्तव राजकारणाशी काहीही संबंध नसतो. ते कुठल्यातरी वेगळ्या जगातील शिक्षण असते आणि वास्तव राजकारण वेगळ्याच विश्वात घडत असते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला? राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ घटना

लहानपणापासूनच राजकारणात येण्याचा विचार केला होता का? असे राहुल गांधींना विचारण्यात आले. लहानपणापासून राजकारणात येण्याचा काही विचार नव्हता. तसे काही ठरवले नव्हते. पण जेव्हा बाबांचे निधन झाले, तेव्हा वाटले की राजकारणात यायला हवे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर वाटले की त्यांना जे करायचे होते, ते करण्यापासून कुणीतरी त्यांना थांबवले. मग राजकारणात येण्याचा विचार केला. तुम्हाला समोर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी बदलण्यासाठी आधी स्वत:ला बदलावे लागते, असे राहुल गांधींनी नमूद केले.

दरम्यान, यावेळी राहुल गांधींना लग्न करण्याबाबत विचारले गेले. तेव्हा, लग्नाचा दबाव? मी गेल्या २०-३० वर्षांपासून लग्नाचे दडपण लांब ठेवण्यात यशस्वी ठरलो आहे. पण मला वाटतं ती एक चांगली गोष्ट आहे. यापुढे आता लग्न करण्याचा विचार आहे का, या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, हो. म्हणजे त्यासाठी काही वेगळे नियोजन करत नाही. पण जर ते घडले तर ती एक चांगली गोष्ट आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेस