शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला? राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ घटना, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:54 IST

Congress MP Rahul Gandhi News: यापुढे आता लग्न करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राहुल गांधींनी सूचक शब्दांत सकारात्मक उत्तर दिले.

Congress MP Rahul Gandhi News: विविध विषयांवरून केवळ राज्यातील नाही, तर देशातील वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे १० वर्षांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी काही पक्षांनी उमेदवार यादीही जाहीर केली आहे. भाजपाच्या यादीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले, तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात जागावाटपावरून मतभेद होत असल्याची चर्चा आहे. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला, याबाबत सांगितले.

राहुल गांधी सध्या काश्मीर दौऱ्यावर असून श्रीनगरमध्ये त्यांनी काही महाविद्यालयीन युवतींशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. शिक्षणाचा संदर्भ देताना राहुल गांधी म्हणाले की, माझा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याबाबतचा अनुभव असा आहे की, जे ते तुम्हाला विद्यापीठांमध्ये शिकवतात, त्याचा वास्तव राजकारणाशी काहीही संबंध नसतो. ते कुठल्यातरी वेगळ्या जगातील शिक्षण असते आणि वास्तव राजकारण वेगळ्याच विश्वात घडत असते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला? राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ घटना

लहानपणापासूनच राजकारणात येण्याचा विचार केला होता का? असे राहुल गांधींना विचारण्यात आले. लहानपणापासून राजकारणात येण्याचा काही विचार नव्हता. तसे काही ठरवले नव्हते. पण जेव्हा बाबांचे निधन झाले, तेव्हा वाटले की राजकारणात यायला हवे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर वाटले की त्यांना जे करायचे होते, ते करण्यापासून कुणीतरी त्यांना थांबवले. मग राजकारणात येण्याचा विचार केला. तुम्हाला समोर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी बदलण्यासाठी आधी स्वत:ला बदलावे लागते, असे राहुल गांधींनी नमूद केले.

दरम्यान, यावेळी राहुल गांधींना लग्न करण्याबाबत विचारले गेले. तेव्हा, लग्नाचा दबाव? मी गेल्या २०-३० वर्षांपासून लग्नाचे दडपण लांब ठेवण्यात यशस्वी ठरलो आहे. पण मला वाटतं ती एक चांगली गोष्ट आहे. यापुढे आता लग्न करण्याचा विचार आहे का, या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, हो. म्हणजे त्यासाठी काही वेगळे नियोजन करत नाही. पण जर ते घडले तर ती एक चांगली गोष्ट आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेस