शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 4 महिन्यांत तब्बल 62 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:55 IST

Jammu And Kashmir : विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या 62 दहशतवाद्यांपैकी 39 लश्कर-ए-तोयबाचे होते आणि 15 दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश मिळालं आहे. काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा दलांनी या वर्षात आतापर्यंत विविध कारवाईमध्ये 62 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, त्यामध्ये 15 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. काश्मीर प्रदेशाचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या 62 दहशतवाद्यांपैकी 39 लश्कर-ए-तोयबाचे होते आणि 15 दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.

विजय कुमार यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिनचे सहा दहशतवादी आणि अल बद्रचे दोन दहशतवादीही मारले गेले आहेत. घाटी पोलीस प्रमुखांनी 62 पैकी 47 दहशतवादी स्थानिक होते तर 15 परदेशी होते असं म्हटलं आहे. याआधी, पुलवामा जिल्ह्यातील मित्रिगाम गावात रात्रभर झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी अल बद्र (दहशतवादी संघटना) च्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.

काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख एजाज हाफिज आणि शाहिद अयूब अशी झाली आहे. त्यांच्याकडून दोन एके-47 रायफलही जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच या दोन दहशतवाद्यांचा या वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान पुलवामा येथे स्थलांतरित मजुरांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सहभाग होता. 

मित्रिगाम चकमकीच्या पार्श्वभूमीवर पुलवामा जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. एका मोठ्या बागेत दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी मित्रिगाम गावाला वेढा घातला. यानंतर बुधवारी दुपारपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली, जी रात्री उशिरापर्यंत चालली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी