शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Jammu And Kashmir : जम्मूमधील शाळा, महाविद्यालये आजपासून सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 10:38 IST

जम्मूमधील शाळा व महाविद्यालये आजपासून सुरू होत आहेत. जम्मूमधून कलम 144 (जमावबंदी) हटवण्यात आले आहे.

ठळक मुद्देजम्मूमधील शाळा व महाविद्यालये आजपासून सुरू होत आहेत. जम्मूमधून कलम 144 (जमावबंदी) हटवण्यात आले आहे.बकरी ईदमुळे काश्मीरमधील निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा शुक्रवारी (9 ऑगस्ट) काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आणि नमाजासाठी काही काळ लोकांना बाहेर पडण्याचीही सूट देण्यात आली. त्यानंतर आता जम्मूमधील शाळा व महाविद्यालये आजपासून सुरू होत आहेत. जम्मूमधून कलम 144 (जमावबंदी) हटवण्यात आले आहे. तसेच अद्यापही काही भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे. 

बकरी ईदमुळे काश्मीरमधील निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र लोकांना वस्तीच्या जवळपास तसेच बाजारात जाण्याचीच परवानगी आहे. बाजार व दुकानेही सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे. काश्मीर खोऱ्यात अद्याप सर्वत्र हाय अ‍ॅलर्ट असून, लोकांच्या वर्दळीवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. उधमपूर व सांबा जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालये शुक्रवारी सुरू झाली. जम्मूतील शाळा सुरू झाल्या असल्या तरी काश्मीर खोऱ्यातील शाळा कधी सुरू होणार, हे स्पष्ट झालेले नाही.

श्रीनगरची सर्वात मोठ्या जामा मशिदीची दारे अद्याप बंदच आहेत. केवळ लहान मशिदींमध्ये नमाज अदा करण्याची मुभा देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान जम्मू-काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या विभाजनाच्या कायद्यावर शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सह्या केल्या. मात्र ही राज्ये केव्हापासून अस्तित्वात येणार, हे स्पष्ट झालेले नाही.

जमावबंदी कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलमाच्या निर्णयाचे देशात सर्वत्र स्वागत झाले असून जम्मू-काश्मीरमधील स्थिती सुरळीत होत आहे, असा दावा गुरुवारी केला होता. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये सर्वत्र जमावबंदी लागू असून, नेहमीपेक्षा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यातूनच खरी वस्तुस्थिती कळून येते, अशी टीका डाव्या पक्षांनी केली आहे.

जम्मू काश्मीरची विधानसभा आणि लोकप्रतिनिधींबाबत मोदींनी केली मोठी घोषणा  

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम 370 आणि कलम 35 अ हटवण्याबाबत घेतेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा आणि लोकप्रतिनिधींबाबत मोठी घोषणा केली. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश असला तरी येथे विधानसभा असेल. तसेच काश्मिरी जनतेला आधीप्रमाणेच आपले लोकप्रतिनिधी निवडता येतील, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदी म्हणाले की, फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तानमधून भारतात आले. मात्र त्यावेळी काश्मीरमध्ये गेलेल्या निर्वासितांना अद्याप मताधिकार मिळालेला नाही. तसेच 'आज या संबोधनामधून मी जम्मू काश्मिरी जनतेला आश्वस्त करून इच्छितो की, जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश घोषित झाला असला तरी येथे विधानसभा असेल आणि मुख्यमंत्रीही असेल. तसेच येथील जनता पूर्वीप्रमाणेच आपले आमदार निवडून देऊ शकतील. जम्मू-काश्मीरमधील व्यक्तींना पूर्ण पारदर्शकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडता येईल. तसेच लवकरच येथे निवडणुका होतील', अशी माहिती मोदींनी दिली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSchoolशाळाcollegeमहाविद्यालयArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदी