शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'अब जाग जाएगी जम्मू-कश्मीर की हिल...'; रामदास आठवलेंनी कवितेतून मोकळं केलं 'दिल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 19:34 IST

रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना काव्यरूपी पुष्पमाला घातली.

ठळक मुद्देकलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र सरकारने आज जाहीर केला. रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना काव्यरूपी पुष्पमाला घातली.

जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र सरकारने आज जाहीर केला. जम्मू-काश्मीर दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यासंबंधीचं विधेयकही राज्यसभेत मंजूर झालं. या निर्णयाचं स्वागत कुणी लाडू-पेढे वाटून करतंय, तर कुणी बॅनर-होर्डिंग लावून करतंय. परंतु, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना काव्यरूपी पुष्पमाला घातली.

कलम ३७० रद्द करण्याच्या शिफारशीवर राज्यसभेत दिवसभर चर्चा झाली. त्यावेळी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडली. या चर्चेदरम्यान रामदास आठवलेंच्या कवितेनं रंगत आणली.

'अब जाग जाएगी जम्मू-कश्मीर की हिल, अब आतंकवाद हो जाएगा निल, इसलिए मुझे अच्छा हो रहा है फील'

'आज का दिन नहीं है काला, इसलिए मैं नरेंद्र मोदी और अमित शाह को पहनाता हूं माला' 

'अलगाववादियों के मुंह पर लग जाएगा अब ताला और आतंकवाद का साफ हो जाएगा नाला भारत जिंदाबाद का गूंज जाएगा अब वहां नारा और जाग जाएगा जम्मू-कश्मीर सारा' 

'नरेंद्र मोदी सरकार ने 370 कानून को हटा दिया है और अमित शाह ने कांग्रेस वालों को कुछ टाइम तक वेल में बिठा दिया है' 

'भारत के लोगों की जो भावना थी उसको हमने मिटा दिया है पाकिस्तान जिंदाबाद बोलने वालों का नाम मिटा दिया है' 

काश्मीर हे आमच्या देशाचं शिर आहे. हे शिर कापण्यासाठी पाकिस्तानने अनेक कुटील डाव रचले. या पार्श्वभूमीवर, सरकारचं हे धाडसी पाऊल दहशतवाद संपवण्याचं काम करेल. दहशतवाद्यांना जेरबंद करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेला धरूनच ही शिफारस करण्यात आली आहे, असं रामदास आठवले म्हणाले. गुलाम नबी आझाद यांच्या नावातच आझाद आहे आणि या विधेयकाद्वारे आम्ही काश्मीर आझादच करत आहोत. ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काश्मीरचं हित पाहून या विधेयकाला पाठिंबा द्यायला हवा, असा टोलाही त्यांनी मारला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एRamdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा