शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'अब जाग जाएगी जम्मू-कश्मीर की हिल...'; रामदास आठवलेंनी कवितेतून मोकळं केलं 'दिल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 19:34 IST

रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना काव्यरूपी पुष्पमाला घातली.

ठळक मुद्देकलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र सरकारने आज जाहीर केला. रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना काव्यरूपी पुष्पमाला घातली.

जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र सरकारने आज जाहीर केला. जम्मू-काश्मीर दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यासंबंधीचं विधेयकही राज्यसभेत मंजूर झालं. या निर्णयाचं स्वागत कुणी लाडू-पेढे वाटून करतंय, तर कुणी बॅनर-होर्डिंग लावून करतंय. परंतु, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना काव्यरूपी पुष्पमाला घातली.

कलम ३७० रद्द करण्याच्या शिफारशीवर राज्यसभेत दिवसभर चर्चा झाली. त्यावेळी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडली. या चर्चेदरम्यान रामदास आठवलेंच्या कवितेनं रंगत आणली.

'अब जाग जाएगी जम्मू-कश्मीर की हिल, अब आतंकवाद हो जाएगा निल, इसलिए मुझे अच्छा हो रहा है फील'

'आज का दिन नहीं है काला, इसलिए मैं नरेंद्र मोदी और अमित शाह को पहनाता हूं माला' 

'अलगाववादियों के मुंह पर लग जाएगा अब ताला और आतंकवाद का साफ हो जाएगा नाला भारत जिंदाबाद का गूंज जाएगा अब वहां नारा और जाग जाएगा जम्मू-कश्मीर सारा' 

'नरेंद्र मोदी सरकार ने 370 कानून को हटा दिया है और अमित शाह ने कांग्रेस वालों को कुछ टाइम तक वेल में बिठा दिया है' 

'भारत के लोगों की जो भावना थी उसको हमने मिटा दिया है पाकिस्तान जिंदाबाद बोलने वालों का नाम मिटा दिया है' 

काश्मीर हे आमच्या देशाचं शिर आहे. हे शिर कापण्यासाठी पाकिस्तानने अनेक कुटील डाव रचले. या पार्श्वभूमीवर, सरकारचं हे धाडसी पाऊल दहशतवाद संपवण्याचं काम करेल. दहशतवाद्यांना जेरबंद करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेला धरूनच ही शिफारस करण्यात आली आहे, असं रामदास आठवले म्हणाले. गुलाम नबी आझाद यांच्या नावातच आझाद आहे आणि या विधेयकाद्वारे आम्ही काश्मीर आझादच करत आहोत. ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काश्मीरचं हित पाहून या विधेयकाला पाठिंबा द्यायला हवा, असा टोलाही त्यांनी मारला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एRamdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा