शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

शिक्षिकेच्या हत्येनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतीचं वातावरण; 100 हून अधिक हिंदू कुटुंबांनी केलं पलायन- रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 01:15 IST

श्रीनगरच्या दक्षिणेकडील कुलगाममध्ये एका सरकारी शाळेबाहेर दहशतवाद्यांनी मंगळवारी 36 वर्षीय रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

काश्मीर खोऱ्यात वाढलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांनी सरकारसमोर नवी समस्या उभी केली आहे. कुलगाममध्ये एका हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर किमान 100 हिंदू कुटुंबांनी काश्मीरमधून पलायन केल्याचा दावा एका समुदायाच्या नेत्याने बुधवारी केला. श्रीनगरच्या दक्षिणेकडील कुलगाममध्ये एका सरकारी शाळेबाहेर दहशतवाद्यांनी मंगळवारी 36 वर्षीय रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

बारामुल्लामधील काश्मिरी पंडित कॉलनीचे अध्यक्ष अवतार कृष्ण भट यांनी म्हटले आहे, की मंगळवारपासून या भागात राहणाऱ्या ३०० कुटुंबांपैकी जवळपास अर्ध्या कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. कालच्या हत्येनंतर ते घाबरले होते, असेही ते म्हणाले. एवढेच नाही, तर आम्हीही उद्यापर्यंत निघून जाऊ. आम्ही सरकारच्या उत्तराची वाट पाहत आहोत. ते म्हणाले, सरकारने आमचे काश्मीरमधून बाहेर स्थानांत करण्यास सांगितले होते. 

श्रीनगरचा भाग सील -पोलिसांनी श्रीनगरमधील एक भाग सील केला आहे,  तसेच ज्या भागांत काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी राहत त्या भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असा दावा येथील रहिवाशांनी केला आहे. याशिवाय, स्थानिक प्रशासनाने कुटुंबांच्या पलायनासंदर्भात भाष्य केलेले नाही. मात्र, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिरी पंडितांना, त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी