शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Jammu and Kashmir : श्रीनगरमध्ये पोलिसांच्या टीमवर दहशतवादी हल्ला; गोळीबारात एक अधिकारी शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 16:46 IST

Jammu and Kashmir : दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये दहशतवादी पोलिसांवर हल्ला करत असल्याचं दिसत आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये रविवारी (12 सप्टेंबर) पोलिसांच्या टीमवर दहशतवादी हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खानयार परिसरात दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलल्या गोळीबारात पोलीस अधिकारी अरशद यांना गोळ्या लागल्या आहेत. यानंतर जखमी झालेल्या अरशद यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. ते शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं. या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी संबंधित परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये दहशतवादी पोलिसांवर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून चनापोरा भागात तैनात असलेल्या जवानांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी चनापोरा येथील CRPF BN 29 वर ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान जखमी झाला. तसेच एक महिला देखील जखमी झाली होती. 

दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच! जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी 

श्रीनगरमधील चनापोरा पोलीस स्टेशनच्या बाहेर सुरक्षा दलाच्या ब्लॉकवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF च्या संयुक्त टीमने परिसराला घेराव घातला. याआधी काही दिवसांपूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील शेरबाग येथील एका पोलीस चौकीवरही दहशतवाद्यांनी ग्रेनेडनं हल्ला केला होता. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्यात आयएसआयचा मोलाचा वाटा आहे. आयएसआयच्या मदतीमुळेच तालिबानला अफगाणिस्तान काबीज करता आला. त्यानंतर आता आयएसआयनं लष्कर-ए-तोएबा, जेईएम आणि अल-बद्रच्या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. 

भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये 200 दहशतवादी घातपाताच्या तयारीत

गेल्या दोन महिन्यांपासून दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जात आहेत. सध्याच्या घडीला जम्मू-काश्मीरात जवळपास 200 दहशतवादी सक्रीय आहेत. यामध्ये परदेशी आणि स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. आयएसआयकडून आदेश मिळताच ते घातपात घडवू शकतात. आयएसआयचे मनसुबे पाहता भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारतीय सुरक्षा दलानं सीमा ग्रीड आणखी मजबूत केलं आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त वाढवला आहे. सीमेपलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी सीमावर्ती गावांमध्ये आश्रय घेतात. त्यांना सहजासहजी आश्रय मिळू नये यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी