शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जम्मू-काश्मीर मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 04:52 IST

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो विषय पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो विषय पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले. आॅर्गनायझेशन आॅफ इस्लामिक को-आॅपरेशनने (ओआयसी) जम्मू आणि काश्मीरवर केलेल्या ठरावावर रवीश कुमार शनिवारी बोलत होते.जम्मू आणि काश्मीरसंदर्भातील ठरावांबद्दल बोलायचे तर आमची भूमिका सुसंगत व चांगली परिचित आहे. ५७ देश सदस्य असलेल्या ओआयसीने काश्मीरवर संमत केलेल्या ठरावात भारतावर कठोरपणे टीका करण्यात आल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.तत्पूर्वी, ओआयसीने जम्मू आणि काश्मीरमध्ये जुलै २०१६ पासून अत्याचार वाढल्याचे, अंतर्गत दहशतवाद वाढल्याचे, बेकायदेशीरपणे स्थानबद्ध करून ठेवण्याचे प्रमाण वाढल्याची जोरदार टीका केली होती.भारतावर ओआयसीने काश्मीरवरून टीका करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भारताच्या हवाई दलाचा विमान पायलट अभिनंदन वर्धमान यांना परत पाठविल्याबद्दल प्रशंसा केली होती.ओआयसीने काश्मीरवर केलेल्या ठरावावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी टीकाकेली.ओआयसीने भारताला खुल्या अधिवेशनासाठी बोलावल्याबद्दल मोदी हे भारताचे मुत्सद्देगिरीचे यश असल्याचे सांगत होते, पण काश्मीर प्रश्नावर याच अधिवेशनाने पाकिस्तानला पाठिंबा देणारा ठराव करणे हे प्रचंड अस्वस्थ करणारे आहे, असे पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटले.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या अबुधाबीत झालेल्या अधिवेशनाला गेल्या होत्या. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी म्हटले की, काश्मीर प्रश्नावर ओआयसीने पाकिस्तानला पाठिंबा देणारा ठराव संमत केला आहे. या ठरावात ओआयसीच्या सदस्य देशांनी पुन्हा म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीर हा पाकिस्तान व भारत यांच्यातील वादाचा महत्त्वाचा मुद्दा असून, दक्षिण आशियात शांतता असावी या स्वप्नासाठी या अधिवेशनाचा ठराव अपरिहार्य आहे. तिवारी म्हणाले की, हा ठराव म्हणजे मुत्सद्देगिरीचे यश आहे का हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना काँग्रेस विचारू इच्छितो.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज