शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जम्मू-काश्मीरमध्ये सज्जाद लोन यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते केंद्र- राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 15:35 IST

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा विसर्जित झाल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील विधानसभा विसर्जित झाल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. केंद्र सरकार सज्जान लोन यांना जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री बनवू इच्छित होते. परंतु जर केंद्र सरकारनं असं केलं असतं तर ती प्रकारची गद्दारी ठरली असती, असंही सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. मी दिल्लीकडे पाहिलं असतं, तर मला लोन यांचं सरकार बनवावं लागलं असतं आणि मी इतिहासात बेइमान माणूस म्हणून ओळखला जाऊ लागलो असतो. त्यामुळे ती ते कारणच संपुष्टात आणलं. मी केलेल्या या प्रकारामुळे काही जण मला शिव्या देत आहेत. परंतु मी जे काही केलं आहे, ते योग्यच आहे, असंही सत्यपाल मलिक म्हणाले आहेत.सत्यपाल मलिक म्हणाले, सज्जाद यांच्याकडे संख्याबळ होते. अशातच केंद्र सरकारनं मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचंच नाव सुचवलं असतं. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी सर्व बाजू सांभाळून काम करतोय. 21 नोव्हेंबरला पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्तींनी सरकार बनवण्याचा दावा केला होता. त्याच्या काही वेळानंतरच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभा विसर्जित केली. त्यानंतर राज्यपालांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. राज भवनातून त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. चार महत्त्वाच्या कारणास्तव राज्यपालांनी जम्मू-काश्मीर विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला आहे.वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं अवघड आहे. त्यातील काही पक्षांनी विधानसभा विसर्जित करण्याची मागणी केली होती. तसेच जनदेशाचा अनादर करून कोणतंही सरकार सत्तेवर येऊ शकत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेत घोडेबाजाराला ऊत येण्याचीही भीतीही राज्यपालांना व्यक्त केली होती.