शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

विधानसभा बरखास्तीवरून काश्मीरमध्ये रणकंदन सुरू, मलिक यांच्यावर तिन्ही पक्षांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 06:22 IST

राज्यात सरकार स्थापनेसाठी आमदारांची सुरू झालेली फोडाफोडी टाळण्यासाठी आणि राज्याच्या हितासाठीच आपण विधानसभा विसर्जित केली, असा दावा काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गुरुवारी केला.

जम्मू/श्रीनगर : राज्यात सरकार स्थापनेसाठी आमदारांची सुरू झालेली फोडाफोडी टाळण्यासाठी आणि राज्याच्या हितासाठीच आपण विधानसभा विसर्जित केली, असा दावा काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गुरुवारी केला. मात्र मोदी सरकारच्या दबावावरूनच विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेससह सर्व पक्षांनी त्यांच्यावर केला.आपणास मेहबुबा मुफ्ती यांचे सत्ता स्थापनेसंबंधीचे पत्र मिळालेच नाही, असे सांगून मलिक म्हणाले की, काल, बुधवारी पैगंबर जयंती असल्याने सरकारी कार्यालयांना सुटी होती, हे मेहबुबा व ओमर अब्दुल्ला यांना माहीत असायला हवे होते.राज्यपालांचा हा निर्णय घटनाविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केला. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, राज्यात लोकनियुक्त सरकार यावे, याचसाठी आम्ही पीडीपीला पाठिंबा दिला होता. आमदारांच्या खरेदी-विक्रीची माहिती राज्यपालांनी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.विधानसभा विसर्जित झाल्याने थंडी संपताच राज्यात निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस या तिघांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनीही काश्मीरमध्ये सहा महिन्यांत निवडणुका व्हायला हव्यात, असे दिल्लीत सांगितले.माधव यांची माघारसीमेपलीकडून (पाकिस्तान) निरोप आल्यानेच पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसने मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी केला होता. त्यावर माधव यांनी आरोप सिद्ध करावा, असे आव्हान ओमर अब्दुल्ला यांनी दिले. त्यानंतर राम माधव यांनी आपण विधान मागे घेत असल्याचे नमूद करीत, मी तुमच्या देशप्रेमाबद्दल शंका व्यक्त करीत नाही, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर