शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पटलं नव्हतं 'कलम 370'; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 17:40 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370 ला विरोध होता.

ठळक मुद्दे2019च्या लोकसभा निवडणुकीतही 'कलम 370' हटवण्याचं आश्वासन भाजपाने दिलं होतं. कलम 370 मधील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची घोषणा अमित शहा यांनी आज केली. हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्याबाबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फारसे सकारात्मक नव्हते.

जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हे गेली 70-72 वर्षं देशाच्या राजकारणात, समाजकारणात चर्चेचा, वादाचा विषय ठरलंय. या कलमावर अनेक निवडणुकाही लढवल्या गेल्या. अगदी ताज्या 2019च्या लोकसभा निवडणुकीतही 'कलम 370' हटवण्याचं आश्वासन भाजपाने दिलं होतं. ते आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण केलं आहे. कलम 370 मधील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची आणि जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. त्यामुळे 'मिशन काश्मीर' फत्ते झाल्याची भावना काही जण व्यक्त करताहेत, तर या निर्णयाचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागू शकतात, असं काहींचं मत आहे. या पार्श्वभूमीवर, थोडं इतिहासात डोकावलं असता, हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्याबाबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फारसे सकारात्मक नव्हते, अशी माहिती समोर आली. इतकंच नव्हे तर, कलम 370 भविष्यात हटवलं जाईल, अशी भविष्यवाणी खुद्द पंडित जवाहरलाल नेहरुंनी केली असल्याचंही समजलं.  

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी अनेक संस्थानं, राजे-महाराजे अस्तित्वात होते. आपलं संस्थान स्वतंत्र ठेवायचं, भारतात विलीन करायचं, की पाकिस्तानात जायचं हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. त्यानुसार बरेच राजे भारतात विलीन झाले. त्यात सरदार वल्लभभाई पटेलांनी मोठी भूमिका बजावली. काही मुस्लिम राजे पाकिस्तानात विलीन झाले होते. जम्मू आणि काश्मीरचे राजा हरी सिंह यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांचं संस्थान पाकिस्तानच्या सीमेला लागून होतं. ते स्वतंत्र राहत असल्याचं कळताच पाकिस्ताननं त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी राजा हरी सिंह यांनी नेहरुंकडे मदत मागितली होती. भारतात विलीन होण्याची तयारी त्यांनी दाखवली, पण काही अटी घातल्या आणि त्यातूनच कलम 370 अस्तित्वात आलं होतं. 

वास्तविक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा या कलमाला, जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याला विरोध होता. इतका की, त्यांनी हे कलम ड्राफ्ट करायलाही विरोध केल्याचं सांगितलं जातं. परंतु, काश्मीर भारताला जोडणं महत्त्वाचं असल्यानं नेहरुंनी राजा हरी सिंह यांच्या अटी मान्य केल्या. डॉ. आंबेडकरांनी नकार दिल्यानंतर नेहरुंनी अय्यंगार यांच्याकरवी हा ड्राफ्ट तयार करून घेतला. त्यावेळीही हे कलम तात्पुरत्या स्वरूपात घटनेत समाविष्ट आलं होतं, अशी माहिती घटनेच्या अभ्यासकांनी दिली. तत्कालीन उपपंतप्रधान सरदार पटेल या कलमाबद्दल सकारात्मक नव्हते, असंही जाणकार सांगतात.

 

आता केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश असेल आणि लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून असित्वात येईल, अशी रचना केली जाणार आहे. अनेक विरोधकांनीही मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. परंतु, काँग्रेसचे नेते आणि काश्मीरमधील विरोधी नेते निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू