शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:21 IST

Jammu and Kashmir assembly : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आणि कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले होते.

जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कलम ३७० पुन्हा लागू करण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. भाजप आमदारांचा विरोधात असतानाही उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांनी हा ठराव विधानसभेत मांडला. या ठरावाला सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळाला.

यावेळी देशविरोधी अजेंडा असल्याचे सांगत भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद' आणि 'मुखर्जींनी बलिदान दिले, ते काश्मीर आमचे आहे' अशा घोषणा दिल्या. अब्दुल्ला परिवार आणि नॅशनल कॉन्फरन्सने लोकांना भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी हा ठराव मंजूर केल्याचा आरोप करत कलम ३७० हटवण्याचा निर्णय अंतिम असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने  ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ११ डिसेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्राचा निर्णय कायम ठेवला होता.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आणि कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले होते.

विधानसभेत मंजूर झालेल्या ठरावात काय म्हटले आहे?जम्मू आणि काश्मीर विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे की, ही विधानसभा विशेष दर्जा आणि घटनात्मक हमींच्या महत्त्वाची पुष्टी करते. ज्याने जम्मू आणि काश्मीरच्या लोकांची ओळख, संस्कृती आणि अधिकारांचे संरक्षण केले. तसेच, हे अधिकार एकतर्फी संपुष्टात आणल्याबद्दल चिंता व्यक्त करते. यासह, विधानसभा भारत सरकारला विशेष दर्जा, घटनात्मक हमी आणि तरतुदी पुनर्संचयित करण्यासाठी घटनात्मक व्यवस्था निर्माण करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या लोकांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू करण्याचे आवाहन करते.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी?विधानसभेत ठराव मंजूर झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी म्हणाले की, २०१९ मध्ये जे काढून घेण्यात आले, त्याची नॅशनल कॉन्फरन्स सरकारने केवळ विशेष दर्जा देण्याची वकिली केली आहे. भाजप नेत्यांचीही ‘नार्को टेस्ट’ केली, तर त्यांनाही हेच हवे आहे, हे समजून येईल. जम्मू-काश्मीरमधील लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा ठराव आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, कलम ३७० हटवल्यानंतर जम्मूच्या लोकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला आहे, कारण बाहेरून लोक जमीन विकत घेत आहेत आणि तिथे रोजगार मिळवत आहेत. तसेच, वाढत्या दहशतवादी घटनांबाबत सुरिंदर चौधरी म्हणाले, उपराज्यपालांच्या कार्यकाळात राजौरी, चिनाब खोरे, कठुआ आणि सांबा येथे दहशतवाद संपला आहे का?

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370BJPभाजपा