शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:21 IST

Jammu and Kashmir assembly : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आणि कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले होते.

जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कलम ३७० पुन्हा लागू करण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. भाजप आमदारांचा विरोधात असतानाही उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांनी हा ठराव विधानसभेत मांडला. या ठरावाला सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळाला.

यावेळी देशविरोधी अजेंडा असल्याचे सांगत भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद' आणि 'मुखर्जींनी बलिदान दिले, ते काश्मीर आमचे आहे' अशा घोषणा दिल्या. अब्दुल्ला परिवार आणि नॅशनल कॉन्फरन्सने लोकांना भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी हा ठराव मंजूर केल्याचा आरोप करत कलम ३७० हटवण्याचा निर्णय अंतिम असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने  ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ११ डिसेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्राचा निर्णय कायम ठेवला होता.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आणि कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले होते.

विधानसभेत मंजूर झालेल्या ठरावात काय म्हटले आहे?जम्मू आणि काश्मीर विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे की, ही विधानसभा विशेष दर्जा आणि घटनात्मक हमींच्या महत्त्वाची पुष्टी करते. ज्याने जम्मू आणि काश्मीरच्या लोकांची ओळख, संस्कृती आणि अधिकारांचे संरक्षण केले. तसेच, हे अधिकार एकतर्फी संपुष्टात आणल्याबद्दल चिंता व्यक्त करते. यासह, विधानसभा भारत सरकारला विशेष दर्जा, घटनात्मक हमी आणि तरतुदी पुनर्संचयित करण्यासाठी घटनात्मक व्यवस्था निर्माण करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या लोकांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू करण्याचे आवाहन करते.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी?विधानसभेत ठराव मंजूर झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी म्हणाले की, २०१९ मध्ये जे काढून घेण्यात आले, त्याची नॅशनल कॉन्फरन्स सरकारने केवळ विशेष दर्जा देण्याची वकिली केली आहे. भाजप नेत्यांचीही ‘नार्को टेस्ट’ केली, तर त्यांनाही हेच हवे आहे, हे समजून येईल. जम्मू-काश्मीरमधील लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा ठराव आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, कलम ३७० हटवल्यानंतर जम्मूच्या लोकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला आहे, कारण बाहेरून लोक जमीन विकत घेत आहेत आणि तिथे रोजगार मिळवत आहेत. तसेच, वाढत्या दहशतवादी घटनांबाबत सुरिंदर चौधरी म्हणाले, उपराज्यपालांच्या कार्यकाळात राजौरी, चिनाब खोरे, कठुआ आणि सांबा येथे दहशतवाद संपला आहे का?

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370BJPभाजपा