शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पाकिस्तानच्या दहशतवाद्यानं मानले भारतीय लष्कराचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 14:48 IST

जम्मू काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यानं भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यानं भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. मी भारतीय लष्करामुळेच जिवंत असल्याची कबुली लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी एजाज अहमद गुजरीनं दिली आहे. जवानांवर गोळीबार केल्यानंतरही प्रत्युत्तरा दाखल त्यांनी माझ्यावर गोळीबार केला नाही. भारतीय जवान मला ठार करू शकले असते, मात्र त्यांनी तसे केले नाही. अशा पद्धतीनं या दहशतवाद्यानं पाकिस्तानचं कु-कृत्यू जगासमोर आणले आहे. शिवाय, आपल्या साथीदारांना दहशतवादाचा मार्ग सोडण्याचं आवाहनही या दहशतवाद्यानं केले आहे.

सुरक्षा दलानं एजाजला त्याच्या दोन साथीदारांसहीत बारामुल्ला परिसरातून अटक केली होती. बुधवारी (9 मे) श्रीनगरमध्ये या दहशतवाद्याला प्रसिद्धी माध्यमांसमोर आणण्यात आले. यावेळीच एजानं सांगितलं की, भारतीय लष्करामुळे मी जिवंत आहे. चकमकीदरम्यान जवानांनी गोळीबार थांबवला होता. ते मला ठारदेखील करू शकले असते, मात्र त्यांनी तसं केले नाही.

''माझ्या अन्य साथीदारांनीही दहशतवादाचा मार्ग सोडावा. आम्ही 6 महिन्यांपासून जंगलात राहत होतो. ज्यादिवशी आमचा भारतीय सैन्यासोबत सामना झाला तेव्हा त्यांनी आम्हाला अटक केले. त्यांनी मला नवीन आयुष्य दिलं'', असे सांगत एजाजनं भारतीय लष्कराचे आभार मानलेत.