शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 13:47 IST

Jama Masjid Sambhal: उत्तर प्रदेशातील जामा मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 

Supreme Court on Jama Masjid Sambhal: उत्तर प्रदेशातील संभळमधील जामा मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले आहेत. संभळ शाही जामा मशीद कमिटीने सत्र न्यायालयाच्या निर्णया आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कोणतीही कारवाई करू नका, असे निर्देश संभळ सत्र न्यायालयाला दिले. 

संभळ सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. संभळ जिल्ह्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर न्यायालयाने चिंता व्यक्त केली. शांतता आणि सोहार्दता असली पाहिजे. आणखी काही घडू नये असे आम्हाला वाटते, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले?

सर्वोच्च न्यायालयाने संभळ सत्र न्यायालयाला सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाशिवाय काहीही करू नये. 

जिल्हा प्रशासनाने सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींची शांतता समिती स्थापन करावी. आपल्याला पूर्णपणे तटस्थ रहावे लागेल आणि हे निश्चित करावे लागेल की, काहीही चुकीचे घडणार नाही. 

याचिकाकर्त्यांना आव्हान देण्याचा अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाही विचारले की, सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी उच्च न्यायालयात का गेला नाही. २२७ नुसार उच्च न्यायालयात जाणे योग्य नाही का? हे प्रलंबित ठेवणे हेच योग्य राहील. तुम्ही तुमची भूमिका योग्य न्यायालयासमोर मांडा, असे सांगतानाच सरन्यायाधीश म्हणाले की, यादरम्यान काही होऊ नये अशीच आमची इच्छा आहे. त्यांना निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार आहे. याचिकाकर्ते रिव्ह्यू वा २२७ नुसार याचिका दाखल करू शकतात.  

मशि‍दीचे सर्वेक्षण असलेला आयुक्तांनी केलेला सर्व्हे लिफाफा बंदच ठेवावा. पुढील निर्णयापर्यंत हा अहवाल खुला करू नये, असेही न्यायालयाने संभळ सत्र न्यायालयाने सांगितले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSupreme Courtसर्वोच्च न्यायालय