शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

गिरणाचे आज आवर्तन सुटणार पाचोर्‍यापर्यंत पाणी : पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

By admin | Updated: March 11, 2016 00:27 IST

जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्‘ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे.

जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्‘ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे.
गिरणा धरणावर जळगाव व नाशिक जिल्‘ातील पाच नगरपालिकांच्या पाणी योजना आहेत. यासह १५८ गावे व २१८ पाणी योजना या धरणावर अवलंबून आहे. काही दिवसांपासून चाळीसगाव, भडगाव व पाचोरा परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे गिरणा धरणाचे दुसरे आवर्तन सोडण्याबाबत मागणी होत होती. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी पाणी टंचाईचा बुधवारी आढावा घेतला होता. त्यानंतर गिरणा पाटबंधारे विभागामार्फत आवर्तन सोडण्याबाबत अभिप्राय पाठविण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री गिरणा धरणावरून पाणी सोडण्यात येणार आहे.
सध्या गिरणा धरणात २६० दलघफूट जिवंत पाणी साठा आहे. तर तीन हजार दलघफू मृतसाठा आहे. तीन हजारामध्ये १५०० दलघफू गाळ आहे. या धरणातून जळगाव जिल्‘ासाठी ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार आहे. त्यात २६० दलघफू जिवंत साठा तर ५४० मृत पाणी साठ्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा जलसाठा पाचोरा तालुक्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
दापोरा बंधार्‍यापर्यंत पाणी मृगजळच
गिरणेचे आवर्तन दापोरा बंधार्‍यापर्यंत सोडण्यात यावे अशी मागणी या भागातील सरपंच व ग्रामस्थांनी केली होती. मात्र सध्या सोडण्यात येणारे पाणी हे केवळ पाचोर्‍यापर्यंत येणार असल्याने म्हसावद, शिरसोली, वावडदा, दापोरा, मोहाडी यासह ३१ गावांची निराशा झाली आहे. गिरणेचे पाणी या ३१ गावांना मिळणार नसल्याने भविष्यात या गावांमधील पाणी टंचाईची स्थिती गंभीर होणार आहे.
जलसंपदा मंत्र्यांची मध्यस्थी महत्त्वाची
नाशिक जिल्‘ातील मालेगाव व अन्य गावांना चणकापूर, हरणबारी, नागासाक्या, गिरणा या धरणांमधून पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे. त्यामुळे किमान १२०० दलघफूट पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाची आहे. मात्र नाशिक जिल्हा प्रशासन फक्त ८०० दलघफूट पाणी सोडण्यावर ठाम आहे. नाशिकचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून वाढीव पाणी सोडण्यास मंजुरी दिल्यास दापोरा बंधार्‍यापर्यंत पाणी येऊन ३१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकतो.