शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

गिरणाचे आज आवर्तन सुटणार पाचोर्‍यापर्यंत पाणी : पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

By admin | Updated: March 11, 2016 00:27 IST

जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्‘ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे.

जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्‘ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे.
गिरणा धरणावर जळगाव व नाशिक जिल्‘ातील पाच नगरपालिकांच्या पाणी योजना आहेत. यासह १५८ गावे व २१८ पाणी योजना या धरणावर अवलंबून आहे. काही दिवसांपासून चाळीसगाव, भडगाव व पाचोरा परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे गिरणा धरणाचे दुसरे आवर्तन सोडण्याबाबत मागणी होत होती. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी पाणी टंचाईचा बुधवारी आढावा घेतला होता. त्यानंतर गिरणा पाटबंधारे विभागामार्फत आवर्तन सोडण्याबाबत अभिप्राय पाठविण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री गिरणा धरणावरून पाणी सोडण्यात येणार आहे.
सध्या गिरणा धरणात २६० दलघफूट जिवंत पाणी साठा आहे. तर तीन हजार दलघफू मृतसाठा आहे. तीन हजारामध्ये १५०० दलघफू गाळ आहे. या धरणातून जळगाव जिल्‘ासाठी ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार आहे. त्यात २६० दलघफू जिवंत साठा तर ५४० मृत पाणी साठ्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा जलसाठा पाचोरा तालुक्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
दापोरा बंधार्‍यापर्यंत पाणी मृगजळच
गिरणेचे आवर्तन दापोरा बंधार्‍यापर्यंत सोडण्यात यावे अशी मागणी या भागातील सरपंच व ग्रामस्थांनी केली होती. मात्र सध्या सोडण्यात येणारे पाणी हे केवळ पाचोर्‍यापर्यंत येणार असल्याने म्हसावद, शिरसोली, वावडदा, दापोरा, मोहाडी यासह ३१ गावांची निराशा झाली आहे. गिरणेचे पाणी या ३१ गावांना मिळणार नसल्याने भविष्यात या गावांमधील पाणी टंचाईची स्थिती गंभीर होणार आहे.
जलसंपदा मंत्र्यांची मध्यस्थी महत्त्वाची
नाशिक जिल्‘ातील मालेगाव व अन्य गावांना चणकापूर, हरणबारी, नागासाक्या, गिरणा या धरणांमधून पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे. त्यामुळे किमान १२०० दलघफूट पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाची आहे. मात्र नाशिक जिल्हा प्रशासन फक्त ८०० दलघफूट पाणी सोडण्यावर ठाम आहे. नाशिकचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून वाढीव पाणी सोडण्यास मंजुरी दिल्यास दापोरा बंधार्‍यापर्यंत पाणी येऊन ३१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकतो.