शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

गिरणाचे आज आवर्तन सुटणार पाचोर्‍यापर्यंत पाणी : पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

By admin | Updated: March 11, 2016 00:27 IST

जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्‘ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे.

जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्‘ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे.
गिरणा धरणावर जळगाव व नाशिक जिल्‘ातील पाच नगरपालिकांच्या पाणी योजना आहेत. यासह १५८ गावे व २१८ पाणी योजना या धरणावर अवलंबून आहे. काही दिवसांपासून चाळीसगाव, भडगाव व पाचोरा परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे गिरणा धरणाचे दुसरे आवर्तन सोडण्याबाबत मागणी होत होती. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी पाणी टंचाईचा बुधवारी आढावा घेतला होता. त्यानंतर गिरणा पाटबंधारे विभागामार्फत आवर्तन सोडण्याबाबत अभिप्राय पाठविण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री गिरणा धरणावरून पाणी सोडण्यात येणार आहे.
सध्या गिरणा धरणात २६० दलघफूट जिवंत पाणी साठा आहे. तर तीन हजार दलघफू मृतसाठा आहे. तीन हजारामध्ये १५०० दलघफू गाळ आहे. या धरणातून जळगाव जिल्‘ासाठी ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार आहे. त्यात २६० दलघफू जिवंत साठा तर ५४० मृत पाणी साठ्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा जलसाठा पाचोरा तालुक्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
दापोरा बंधार्‍यापर्यंत पाणी मृगजळच
गिरणेचे आवर्तन दापोरा बंधार्‍यापर्यंत सोडण्यात यावे अशी मागणी या भागातील सरपंच व ग्रामस्थांनी केली होती. मात्र सध्या सोडण्यात येणारे पाणी हे केवळ पाचोर्‍यापर्यंत येणार असल्याने म्हसावद, शिरसोली, वावडदा, दापोरा, मोहाडी यासह ३१ गावांची निराशा झाली आहे. गिरणेचे पाणी या ३१ गावांना मिळणार नसल्याने भविष्यात या गावांमधील पाणी टंचाईची स्थिती गंभीर होणार आहे.
जलसंपदा मंत्र्यांची मध्यस्थी महत्त्वाची
नाशिक जिल्‘ातील मालेगाव व अन्य गावांना चणकापूर, हरणबारी, नागासाक्या, गिरणा या धरणांमधून पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे. त्यामुळे किमान १२०० दलघफूट पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाची आहे. मात्र नाशिक जिल्हा प्रशासन फक्त ८०० दलघफूट पाणी सोडण्यावर ठाम आहे. नाशिकचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून वाढीव पाणी सोडण्यास मंजुरी दिल्यास दापोरा बंधार्‍यापर्यंत पाणी येऊन ३१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकतो.