शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

 ...तर जेटली मंत्री झाले नसते, यशवंत सिन्हा यांचा पलटवार; आजी - माजी अर्थमंत्र्यांतील वाद सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:11 IST

यशवंत सिन्हा आणि अरुण जेटली या आजी - माजी मंत्र्यांतील वाद थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज अर्थमंत्री पदावर दिसले नसते, असा पलटवार माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे.

नवी दिल्ली : यशवंत सिन्हा आणि अरुण जेटली या आजी - माजी मंत्र्यांतील वाद थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज अर्थमंत्री पदावर दिसले नसते, असा पलटवार माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे.यशवंत सिन्हा यांनी एक लेख लिहून सरकार आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. अर्थमंत्री जेटली यांनी गुरुवारी यावर उत्तर देत यशवंत सिन्हा यांना फटकारले होते की, ८०व्या वर्षीही सिन्हा हे मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत (नोकरी मागत आहेत). त्यावर सिन्हा यांनी उत्तर देत जेटली यांना आज पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. सिन्हा म्हणाले की, सरकार परिस्थिती समजून घेण्यात अपयशी ठरत आहे.समस्या समजून घेण्याऐवजी स्वत:ची स्तुती करण्यात आणि आपलीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. जर अर्थव्यवस्थेशी संबंधित काही बाबी असतील तर त्याला अर्थमंत्रीच जबाबदार असतील, गृहमंत्री नव्हे. माझा मुलगा जयंत सिन्हा यांना माझ्याविरुद्ध उतरवून सरकार मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. मीसुद्धा व्यक्तिगत हल्ले करू शकतो. पण, त्यांच्या जाळ्यात फसू इच्छित नाही. पक्षातील अनेक नेते माझ्या मताशी सहमत आहेत. पण, भीतीमुळे ते बोलू शकत नाहीत.हे माझे मत : जयंत सिन्हामाजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी लेख लिहून सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर त्याला उत्तर म्हणून त्यांचेच चिरंजीव आणि सरकारमधील नागरी उड्डयण मंत्री जयंत सिन्हा यांनी गुुरुवारी उत्तर दिले.मात्र, जयंत सिन्हा सरकारची भाषा बोलत असल्याची टीका झाल्यानंतर आज जयंत सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, मी कुणाच्या सांगण्यावरून बोलत नाही.हा माझ्या अंतरात्म्याचा आवाज आहे. ही अतिशय गंभीर चर्चा असून, ती व्यक्तिगत घेतली जाऊ नये. मुलगा आणि पुत्र या नात्याने याकडे पाहिले जाऊ नये.

टॅग्स :BJPभाजपा