शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

कॉर्पोरेट झगमगाट सोडून जयशंकर परराष्ट्र मंत्रालयात झाले रुजू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 04:42 IST

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बजावली मोलाची भूमिका

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : परराष्ट्र सचिवपदावरून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले टाटा सन्सच्या ग्लोबल कॉर्पोरेट अफेअर्सचे अध्यक्षपद सोडून देणारे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यामुळे भारताच्या ‘डिप्लोमसी’ला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. जयशंकर यांची टाटा सन्समध्ये गेल्या वर्षीच नेमणूक झाली होती. कोट्यवधी रुपयांचे मानधन, जगात कुठेही मिळणाऱ्या सोयी-सुविधा नाकारून जयशंकर यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याची ‘ल्यूटन्स’ दिल्लीत चर्चा आहे.

टाटा समूहाच्या जगभरातील सर्व उद्योगांची जबाबदारी जयशंकर यांच्यावर होती. परदेशात व्यापारविस्तार आणि कमी व्यापार असलेल्या देशांशी संपर्क करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. परराष्ट्र सेवेतील अनुभवांचा फायदा मात्र पुन्हा देशासाठीच करण्याची तीव्र इच्छा जयशंकर यांना होती. त्याविषयी ते पहिल्यांदा बोलले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी.

डोवाल यांनी हा निरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवला. गेले वर्षभर जयशंकर परराष्ट्र धोरणात वेळोवेळी सल्ला देतच होते. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून ‘समांतर डिप्लोमसी’ राबविताना त्यांनी मोलाचा सल्ला दिला. आयसीसीआरकडून विदेशात सांस्कृतिक संचालक नेमताना मुलाखत घेण्यासाठी स्वत: ते उपस्थित होते.

विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनशी संबंधयूपीएच्या काळात डोवाल यांनी विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनद्वारे जयशंकर यांच्यासारख्या अनेक बुद्धिमान अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फाऊंडेशनच्या वास्तूत जयशंकर अनेकदा आले, बोलले. निवृत्तीनंतर त्यांना ‘उजव्या’ विचारसरणीच्या व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी डोवाल यांनी पुरेपूर सांभाळली. एकीकडे अमेरिकेची अरेरावी, तर दुसरीकडे चीनची आशिया खंडातील दादागिरी या पार्श्वभूमीवर जयशंकर यांना परराष्ट्रमंत्री करण्याचा डोवाल यांचा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ मान्य केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार