शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्पोरेट झगमगाट सोडून जयशंकर परराष्ट्र मंत्रालयात झाले रुजू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 04:42 IST

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बजावली मोलाची भूमिका

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : परराष्ट्र सचिवपदावरून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले टाटा सन्सच्या ग्लोबल कॉर्पोरेट अफेअर्सचे अध्यक्षपद सोडून देणारे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यामुळे भारताच्या ‘डिप्लोमसी’ला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. जयशंकर यांची टाटा सन्समध्ये गेल्या वर्षीच नेमणूक झाली होती. कोट्यवधी रुपयांचे मानधन, जगात कुठेही मिळणाऱ्या सोयी-सुविधा नाकारून जयशंकर यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याची ‘ल्यूटन्स’ दिल्लीत चर्चा आहे.

टाटा समूहाच्या जगभरातील सर्व उद्योगांची जबाबदारी जयशंकर यांच्यावर होती. परदेशात व्यापारविस्तार आणि कमी व्यापार असलेल्या देशांशी संपर्क करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. परराष्ट्र सेवेतील अनुभवांचा फायदा मात्र पुन्हा देशासाठीच करण्याची तीव्र इच्छा जयशंकर यांना होती. त्याविषयी ते पहिल्यांदा बोलले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी.

डोवाल यांनी हा निरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवला. गेले वर्षभर जयशंकर परराष्ट्र धोरणात वेळोवेळी सल्ला देतच होते. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून ‘समांतर डिप्लोमसी’ राबविताना त्यांनी मोलाचा सल्ला दिला. आयसीसीआरकडून विदेशात सांस्कृतिक संचालक नेमताना मुलाखत घेण्यासाठी स्वत: ते उपस्थित होते.

विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनशी संबंधयूपीएच्या काळात डोवाल यांनी विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनद्वारे जयशंकर यांच्यासारख्या अनेक बुद्धिमान अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फाऊंडेशनच्या वास्तूत जयशंकर अनेकदा आले, बोलले. निवृत्तीनंतर त्यांना ‘उजव्या’ विचारसरणीच्या व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी डोवाल यांनी पुरेपूर सांभाळली. एकीकडे अमेरिकेची अरेरावी, तर दुसरीकडे चीनची आशिया खंडातील दादागिरी या पार्श्वभूमीवर जयशंकर यांना परराष्ट्रमंत्री करण्याचा डोवाल यांचा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ मान्य केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार