शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

सिनेमाला शोभावी अशीच आहे भाजपा उमेदवार असलेल्या 'या' राजकुमारीची लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 1:36 PM

जयपुरच्या राजकुमारी दीया कुमारी यांची लव्हस्टोरी जी एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभावी अशीच आहे.

(Image Credit : Facebook)

जयपुरच्या राजकुमारी दीया कुमारी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कारण त्यांना भाजपाकडून राजसमंदमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राजकुमारी दीया कुमारी या त्यांच्या सुंदरतेसाठी नेहमीच चर्चेत असतात. याआधी त्यांची सर्वात जास्त चर्चा झाली होती ती पती नरेंद्र कुमार यांच्याकडून जानेवारीमध्ये घटस्फोटाची. राजकुमारी दीया कुमारी यांच्या घटस्फोटाची जितकी चर्चा झाली त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्या लव्ह मॅरेजची झाली होती. केवळ राजस्थानच नाही तर देशभरात या लग्नाची चर्चा रंगली होती. कारण त्यांनी कुण्या राजघराण्यातील राजकुमाराशी नाही तर एका सामान्य व्यक्तीसोबत गुपचूप कोर्टात लग्न केलं होतं. त्यांच्या या लग्नाला दोन्ही परिवाराकडून विरोध होता. 

डिसेंबरमध्ये जेव्हा राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा राजकुमारी दीया कुमारी यांनी कौटुंबिक कारणांमुळे निवडणूक लढण्यास नकार दिला होता. असे सांगितले जात होते की, त्या आणि पती नरेंद्र कुमार हे पाच ते सहा वर्षांपासून वेगळे राहत होते. काही कारणांवरुन त्यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे ते वेगळे राहत होते. पण एकेकाळी सर्वांचा विरोध धुडकावून लावत राजकुमारी दीया कुमारी यांनी नरेंद्र यांच्याशी लग्न केलं होतं. 

जेव्हा त्यांची लव्हस्टोरी २१ वर्षांआधी मीडियासमोर आली तेव्हा असे कळाले होते की, त्यांनी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन दिल्लीत गुपचूप कोर्ट मॅरेज केलं होतं. तसेच तेव्हा अशीही चर्चा रंगली होती की, नरेंद्र राजकुमारीच्या अकाऊंट विभागात नोकरी करत होते. काहींनी म्हटलं होतं की, ते त्यांचे ड्रायव्हर होते. पण नंतर दीया कुमारी यांनी एक ब्लॉग लिहून या चुकीच्या चर्चा होत असल्याचं सांगितलं होतं. 

दीया कुमारी या जयपुरचे महाराज सवाई भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांची एकुलती एक कन्या. त्यांनी २०१३ मध्ये भाजपाच्या तिकीटावर सवाईमाधोपुरमधून विधानसभा सीट जिंकली होती. दीया कुमारी यांनी त्यांचं शिक्षण नवी दिल्ली, जयपुर आणि नंतर लंडन इथे केलं होतं. दीया कुमारी आणि नरेंद्र सिंह यांना दोन मुलं पद्मनाभ सिंह आणि लक्ष्यराज सिंह आहेत. आणि एक गौरवी ही मुलगी आहे. दीया कुमारी यांनी १९९७ मध्ये लग्न केलं होतं. त्यानी एका ब्लॉगच्या माध्यमातून त्यांची लव्हस्टोरी जगासमोर आणली होती. 

(Image Credit : AmarUjala)

त्यांनी लिहिले होते की, ज्याप्रकारे मीडियात केवळ अंदाज बांधले जात आहेत, ते मला अजिबात पसंत आलं नाही. ज्या व्यक्तीला मी भेटले आणि नंतर त्याला जीवनसाथी करण्याचा निर्णय घेतल्या त्या व्यक्तीबाबत मीडियाला काहीच माहीत नाही. त्यांनी म्हटले होते की, भलेही मी राजघराण्याशी संबंधित आहे. पण मी बाहेरच्या दुनियेतील लोकांशी संपर्कात होती. माझ्या पालकांनी एका मोकळ्या वातावरणात लहानाचं मोठं केलं. तेव्हाच मी वेगवेगळ्या लोकांना भेटू शकले आणि मित्र बनवले. मी एका सामान्य मुलीप्रमाणे राहते. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, जेव्हा मी १८ वर्षांची होते तेव्हा मी पहिल्यांदा नरेंद्र कुमार राजावत यांना भेटले होते. ते ना आमच्याकडे कॅशिअर होते, ना ते आमच्याकडे ड्रायव्हर होते. मीडियाने चुकीचं लिहिलं आहे. 

माझं लग्न एका परिकथेसारखं नक्कीच होतं. पण माझे पती सामान्य व्यक्ती नव्हते. ते एक चार्टर्ड अकाऊंटंट होते. त्यांच्या याच शिक्षणाशी संबंधित कामामुळे त्यांनी आमच्या एसएमएस म्युझिअम ट्रस्टच्या अकाऊंट विभागात जॉइन केलं होतं. जेणेकरुन त्यांना अनुभव मिळावा आणि त्यांना शिकता यावं. या विभागात ते तीन महिने होते. त्यानंतर त्यांनी स्वत:चं कन्स्ट्रक्शनचं काम सुरु केला होता. 

(Image Credit : dbpost)

राजकुमारी दीया कुमारी यांनी ब्लॉग रॉयल्टी ऑफ राजपूताना लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिले की, नरेंद्र कुमार जेव्हा त्यांच्या अकाऊंट विभागात आले तेव्हा आमची भेट झाली. ते मला आवडले होते. पहिल्यांदा आम्ही महालात भेटलो. काही कामानिमित्त ते आले होते. मी सुद्धा अकाऊंटचं काम पाहत होते त्यामुळे त्यांना काही काम सांगितलं. त्यानंतर आमचं बोलणं वाढलं. मला त्यांच्यासोबत चांगलं वाटलं. त्यांची सहजता आणि इमानदारीने मी प्रभावित झाले होते. 

पहिल्या नजरेच्या प्रेमात माझा विश्वास नाही. त्यानंतर आमच्या काही भेटी झाल्या. तीन महिन्यांनी जेव्हा ते अकाऊंट विभागातून ट्रेनिंग संपवून गेले, तेव्हा मला त्यांना भेटण्याची इच्छा होऊ लागली होती. जेव्हाही ते जयपुरला यायचे आम्ही कॉमन फ्रेन्डकडे भेटायचो. आता आमची चांगलीच मैत्री झाली होती. पण जेव्हा मी पॅरेंट्ससोबत परदेशात गेले तेव्हा मला त्यांची खूप आठवण येऊ लागली होती. माझं त्यांच्यांवर प्रेम जडलं होतं. मला सतत त्यांच्यासोबत रहावं वाटत होतं. हे मी आईला सांगितले तेव्हा ती नाराज झाली. त्यांची इच्छा होती की, माझं लग्न राजघराण्यात व्हावं. त्यामुळे मी माझं प्रेम विसरावं असं त्यांना वाटत होतं. आईने वडिलांना याबाबत काही सांगितलं नाही.

(Image Credit : picswe.com)

यानंतर आम्ही फार काळजीपूर्वक भेटत होतो. दिल्लीमध्ये आम्ही जास्त भेटायचो. इथे एका मित्राच्या घरी आम्ही भेटायचो. पण हे माझ्या घरच्या लोकांना कळालं. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी मुलगा शोधणं सुरू केलं. काही मुलांना मी भेटले सुद्धा. माझी स्थिती फार वेगळी होती. मला माझ्या आई-वडिलांची चिंताही समजत होती. मी नरेंद्रसोबत नातं संपवण्याचा प्रयत्नही केला. आम्ही एकमेकांशी बोलणंही बंद केलं होतं. मी सहा ते सात महिने त्यांच्यांशी बोलले नाही. पण याचा काही फायदा झाला नाही. प्रेम अधिक वाढत गेलं आणि लग्नाची इच्छाही.

त्यांनी लिहिले की, ते सहा महिने फार वाईट होते. सहा वर्ष एकमेकांना जाणून घेतल्यानंतर आम्ही १९९४ मध्ये दिल्लीतील आर्य समाजात लग्न केलं. त्यानंतर आम्ही लग्न कोर्टातही रजिस्टर केलं. पण याबाबत मी घरी काहीच सांगितलं नाही. एकदा मी आई आणि वडिलांना सांगितलं की, मला या व्यक्तीशी लग्न करायचं आहे. तोपर्यंत मी त्यांना लग्न केल्यांचं सांगितलं नव्हतं. अखेर १९९६ मध्ये मी त्यांना लग्न केल्याचं सांगितलं. 

(Image Credit : YouTube)

एखाद्या सिनेमाची कथा शोभावी असं हे लग्न झालं. त्यानंतर १९९७ मध्ये राजकुमारी दीया कुमारी आणि नरेंद्र कुमार सिंह यांचं भव्य लग्न लावून देण्यात आलं. पण राजपूत समुदायाने एकाच गोत्रामुळे या लग्नाला विरोधही केला होता. या कारणामुळे दीया यांचे वडील राजा भवानी सिंह यांना राजपूत महासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. १९ वर्ष हा वाद सुरू होता. 

पण अचानक या लव्हस्टोरीमध्ये एक वेगळं वळण आलं. दोघांमध्ये वादाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. दीया कुमारी आणि नरेंद्र कुमार ५ वर्षांपासून वेगळं राहत असल्याची चर्चा होऊ लागली होती. पण त्यानंतर पुन्हा एकदा दोघांनी सोबत राहण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा दोघे वेगळे झाले. यादरम्यान जयपुर फॅमिली कोर्टात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर दोघेही वेगळे झालेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक 2019rajsamand-pcराजसमंद