शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

भयंकर! जयपूरमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती; बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 11:34 IST

मुसळधार पावसाने राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये कहर केला आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानक, पोलीस ठाणे, रुग्णालयासह प्रत्येक ठिकाणी पाणी साचलं आहे.

गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये कहर केला आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानक, पोलीस ठाणे, रुग्णालयासह प्रत्येक ठिकाणी पाणी साचलं आहे. पावसामुळे दिल्लीसारखी दुर्घटना जयपूरमध्येही घडली आहे. विश्वकर्मा परिसरात पावसाच्या पाण्याने बेसमेंट भरल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन बेसमेंटमधील पाणी बाहेर काढत आहे.

दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर भागात असलेल्या कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच जयपूरच्या विश्वकर्मा भागातील बेसमेंट पावसाच्या पाण्याने भरलं होतं. ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या याबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. बेसमेंटमधून पाणी काढल्यानंतरच मृतांची ओळख पटणार आहे.

दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर येथे असलेल्या RAU'S IAS कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये बांधलेल्या लायब्ररीत विद्यार्थी शिकत होते. त्याचवेळी मुसळधार पाऊस झाल्याने कोचिंग सेंटरच्या बाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. याच दरम्यान अचानक बेसमेंटमध्ये अवघ्या काही मिनिटांत दहा ते बारा फूट पाणी भरलं. 

ही घटना घडली तेव्हा परीक्षेची तयारी करणारे सुमारे ३५ विद्यार्थी बेसमेंटमध्येशिकत होते. या माहितीनंतर दिल्ली अग्निशमन सेवा आणि एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तीन विद्यार्थ्यांना वाचवता आले नाही. या दुर्घटनेनंतर दिल्लीतील बेसमेंटमध्ये चालणाऱ्या सर्व कोचिंग सेंटरला टाळं ठोकण्यात आलं आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानRainपाऊस