शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भयंकर! जयपूरमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती; बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 11:34 IST

मुसळधार पावसाने राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये कहर केला आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानक, पोलीस ठाणे, रुग्णालयासह प्रत्येक ठिकाणी पाणी साचलं आहे.

गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये कहर केला आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानक, पोलीस ठाणे, रुग्णालयासह प्रत्येक ठिकाणी पाणी साचलं आहे. पावसामुळे दिल्लीसारखी दुर्घटना जयपूरमध्येही घडली आहे. विश्वकर्मा परिसरात पावसाच्या पाण्याने बेसमेंट भरल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन बेसमेंटमधील पाणी बाहेर काढत आहे.

दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर भागात असलेल्या कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच जयपूरच्या विश्वकर्मा भागातील बेसमेंट पावसाच्या पाण्याने भरलं होतं. ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या याबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. बेसमेंटमधून पाणी काढल्यानंतरच मृतांची ओळख पटणार आहे.

दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर येथे असलेल्या RAU'S IAS कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये बांधलेल्या लायब्ररीत विद्यार्थी शिकत होते. त्याचवेळी मुसळधार पाऊस झाल्याने कोचिंग सेंटरच्या बाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. याच दरम्यान अचानक बेसमेंटमध्ये अवघ्या काही मिनिटांत दहा ते बारा फूट पाणी भरलं. 

ही घटना घडली तेव्हा परीक्षेची तयारी करणारे सुमारे ३५ विद्यार्थी बेसमेंटमध्येशिकत होते. या माहितीनंतर दिल्ली अग्निशमन सेवा आणि एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तीन विद्यार्थ्यांना वाचवता आले नाही. या दुर्घटनेनंतर दिल्लीतील बेसमेंटमध्ये चालणाऱ्या सर्व कोचिंग सेंटरला टाळं ठोकण्यात आलं आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानRainपाऊस