शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारताची ओळख निर्माण करण्यात जैन धर्माची अमूल्य भूमिका : पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:50 IST

नवकार महामंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जैन धर्माने भारताची ओळख निर्माण करण्यासाठी अमूल्य भूमिका पार पाडली आहे. या धर्माची शिकवण व मूल्यामुळे दहशतवाद, युद्ध व पर्यावरण संरक्षण यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी मोलाची मदत झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या प्राचीन धर्माचा वारसा आणि शिकवणीचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. नवकार महामंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले, तीर्थंकरांची शिकवण व मूर्तींच्या माध्यमातून या धर्माचा प्रभाव संसद भवनातही दिसून येतो. जैन धर्मातील अनेकांतवाद या सिद्धांतात वेगवेगळ्या दृष्टिकोनाची प्रशंसा केलेली आहे. अनेकांतवाद जैन धर्मात निरपेक्षतेला प्रोत्साहन देणारा एक प्रमुख सिद्धांत असल्याने अंतिम सत्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येते. हा धर्म शांतता, सौहार्द व पर्यावरण संरक्षणाची शिकवण देणारा आहे. हवामान बदल आजचे सर्वांत मोठे संकट असून, स्थायी जीवनशैली हे त्यावरील समाधान आहे. हा समुदाय स्थायी जीवनशैलीचे पालन करत असल्याचे सांगत मोदींनी जैन धर्माची प्रशंसा केली. ‘जितो’चे चेअरमन पृथ्वीराज कोठारी,  ‘जितो’चे प्रेसिडेन्ट विजय भंडारी आणि गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांचा नामोल्लेख करून पंतप्रधानांनी त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी ‘जितो’चे प्रतिनिधी   विज्ञान भवनात उपस्थित होते. 

जैन साहित्य हे भारताच्या  आध्यात्मिक वैभवाचा कणाजैन धर्माचे साहित्य भारताच्या आध्यात्मिक वैभवाचा कणा आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्राने अनेक उपाययोजना केल्या आहेत. प्राचीन जैन  ग्रथांचे डिजिटायझेशन, पाली व प्राकृत भाषेला शास्त्रीय भाषा घोषित करणे, यासारख्या योजना सुरू केल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी