शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भारताची ओळख निर्माण करण्यात जैन धर्माची अमूल्य भूमिका : पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:50 IST

नवकार महामंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जैन धर्माने भारताची ओळख निर्माण करण्यासाठी अमूल्य भूमिका पार पाडली आहे. या धर्माची शिकवण व मूल्यामुळे दहशतवाद, युद्ध व पर्यावरण संरक्षण यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी मोलाची मदत झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या प्राचीन धर्माचा वारसा आणि शिकवणीचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. नवकार महामंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले, तीर्थंकरांची शिकवण व मूर्तींच्या माध्यमातून या धर्माचा प्रभाव संसद भवनातही दिसून येतो. जैन धर्मातील अनेकांतवाद या सिद्धांतात वेगवेगळ्या दृष्टिकोनाची प्रशंसा केलेली आहे. अनेकांतवाद जैन धर्मात निरपेक्षतेला प्रोत्साहन देणारा एक प्रमुख सिद्धांत असल्याने अंतिम सत्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येते. हा धर्म शांतता, सौहार्द व पर्यावरण संरक्षणाची शिकवण देणारा आहे. हवामान बदल आजचे सर्वांत मोठे संकट असून, स्थायी जीवनशैली हे त्यावरील समाधान आहे. हा समुदाय स्थायी जीवनशैलीचे पालन करत असल्याचे सांगत मोदींनी जैन धर्माची प्रशंसा केली. ‘जितो’चे चेअरमन पृथ्वीराज कोठारी,  ‘जितो’चे प्रेसिडेन्ट विजय भंडारी आणि गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांचा नामोल्लेख करून पंतप्रधानांनी त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी ‘जितो’चे प्रतिनिधी   विज्ञान भवनात उपस्थित होते. 

जैन साहित्य हे भारताच्या  आध्यात्मिक वैभवाचा कणाजैन धर्माचे साहित्य भारताच्या आध्यात्मिक वैभवाचा कणा आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्राने अनेक उपाययोजना केल्या आहेत. प्राचीन जैन  ग्रथांचे डिजिटायझेशन, पाली व प्राकृत भाषेला शास्त्रीय भाषा घोषित करणे, यासारख्या योजना सुरू केल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी