शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज पंचत्वात विलीन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 18:38 IST

देशातील प्रसिद्ध जैन मुनी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांनी 'सल्लेखना'द्वारे देहत्याग केला.

Jain Muni Acharya Vidyasagar Maharaj : देशातील प्रसिद्ध जैन मुनी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज (Jain Muni Acharya Vidyasagar Maharaj) यांचे रविवार(दि.18) रोजी रात्री 2:35 वाजता निधन झाले. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथील ‘चंद्रगिरी तीर्थ’ येथे 'सल्लेखना'द्वारे त्यांनी देहत्याग केला. यानंतर डोंगरगड येथील चंद्रगिरी पर्वतावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. विद्यासागर महाराजांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. तसेच, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अर्ध्या दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आचार्य विद्यासागर महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, दिल्लीत आयोजित भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पंतप्रधान मोदी, सर्व केंद्रीय मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपस्थित पक्षाच्या इतर सर्व नेत्यांनी विद्यासागरजी महाराज यांच्यासाटी दोन मिनिटांचे मौन पाळले.

यावेळी पंतप्रधान म्हणाले, “माझ्या संवेदना आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या असंख्य भक्तांसोबत आहेत. अध्यात्मिक प्रबोधनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी केलेले अमूल्य योगदान, आरोग्य सेवेसाठी केलेले कार्य, यासाठी येणाऱ्या पिढ्या त्यांना कायम स्मरणात ठेवतील." दरम्यान, गेल्या वर्षी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी डोंगरगड येथे विद्यासागर महाराज यांची भेट घेतली होती.

छत्तीसगड-MP च्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावनाआचार्य विद्यासागर महाराज यांच्या निधनाबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी X वर लिहिले- "परम पूज्य संत 108 आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांचे निधन ही जैन समाजाची आणि राष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी आहे." तसेच, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव सहाय म्हणाले - "आचार्य विद्यासागर महाराज यांचे देश आणि समाजासाठी केलेले कार्य युगानुयुगे स्मरणात राहील." 

काय आहे 'सलेखना' पद्धत ?चंद्रगिरी तीर्थने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'सल्लेखना' ही जैन धर्मातील एक प्रथा आहे. यामध्ये अन्न-पाणी सोडून शरीराचा त्याग केला जातो. जैन मुनी आणि आचार्य 'सल्लेखना'द्वारे देह सोडतात. आचार्य विद्यासागर जी महाराज यांनीदेखील गेल्या तीन दिवसांपासून अन्न-पाणी सोडले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्रMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगड