शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
6
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
7
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
8
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
9
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
10
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
11
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
12
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
13
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
14
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
15
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
16
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
18
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला; आरोपी 3 मुलांचा बाप!
19
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
20
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
Daily Top 2Weekly Top 5

जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज पंचत्वात विलीन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 18:38 IST

देशातील प्रसिद्ध जैन मुनी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांनी 'सल्लेखना'द्वारे देहत्याग केला.

Jain Muni Acharya Vidyasagar Maharaj : देशातील प्रसिद्ध जैन मुनी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज (Jain Muni Acharya Vidyasagar Maharaj) यांचे रविवार(दि.18) रोजी रात्री 2:35 वाजता निधन झाले. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथील ‘चंद्रगिरी तीर्थ’ येथे 'सल्लेखना'द्वारे त्यांनी देहत्याग केला. यानंतर डोंगरगड येथील चंद्रगिरी पर्वतावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. विद्यासागर महाराजांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. तसेच, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अर्ध्या दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आचार्य विद्यासागर महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, दिल्लीत आयोजित भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पंतप्रधान मोदी, सर्व केंद्रीय मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपस्थित पक्षाच्या इतर सर्व नेत्यांनी विद्यासागरजी महाराज यांच्यासाटी दोन मिनिटांचे मौन पाळले.

यावेळी पंतप्रधान म्हणाले, “माझ्या संवेदना आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या असंख्य भक्तांसोबत आहेत. अध्यात्मिक प्रबोधनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी केलेले अमूल्य योगदान, आरोग्य सेवेसाठी केलेले कार्य, यासाठी येणाऱ्या पिढ्या त्यांना कायम स्मरणात ठेवतील." दरम्यान, गेल्या वर्षी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी डोंगरगड येथे विद्यासागर महाराज यांची भेट घेतली होती.

छत्तीसगड-MP च्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावनाआचार्य विद्यासागर महाराज यांच्या निधनाबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी X वर लिहिले- "परम पूज्य संत 108 आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांचे निधन ही जैन समाजाची आणि राष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी आहे." तसेच, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव सहाय म्हणाले - "आचार्य विद्यासागर महाराज यांचे देश आणि समाजासाठी केलेले कार्य युगानुयुगे स्मरणात राहील." 

काय आहे 'सलेखना' पद्धत ?चंद्रगिरी तीर्थने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'सल्लेखना' ही जैन धर्मातील एक प्रथा आहे. यामध्ये अन्न-पाणी सोडून शरीराचा त्याग केला जातो. जैन मुनी आणि आचार्य 'सल्लेखना'द्वारे देह सोडतात. आचार्य विद्यासागर जी महाराज यांनीदेखील गेल्या तीन दिवसांपासून अन्न-पाणी सोडले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्रMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगड