शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

देशापुढील सर्वात मोठी समस्या अन् क्रांतीचा मंत्र; वाचा, मुनीश्री तरुण सागरजींचं नेमकं विवेचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 15:48 IST

२००८ मध्ये औरंगाबाद इथं राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा महोत्सव झाला होता. त्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवर गुरू-शिष्यांमध्ये प्रश्नोत्तरं रंगली होती.

राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचं आज पहाटे निधन झालं. दहा वर्षांपूर्वी, २००८ मध्ये औरंगाबाद इथं राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा महोत्सव झाला होता. त्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवर गुरू-शिष्यांमध्ये प्रश्नोत्तरं रंगली होती. शिष्यांच्या प्रश्नांना मुनीश्रींनी दिलेली उत्तरं आणि त्यांच्या मार्मिक टिप्पण्यांमधून त्यांच्या अलौकिक ज्ञानाची प्रचिती सगळ्यांनाच आली. या प्रश्नोत्तरांतील काही अंश... 

गुरुदीक्षा का घेतली जाते?>> जगात आकर्षण खूप आहे. त्यात भरकटत जाऊ नये म्हणून प्रत्येकाने 'लाईन ऑफ कंट्रोल' आखणे गरजेचे आहे. त्यासाठी गुरुदीक्षा घेणे आवश्यक असून गुरूमुळे जीवन सुरक्षित होते. 

दररोज भजन कशासाठी?>> दररोज भजन कशासाठी, असा प्रतिसवाल विचारत मुनीश्री म्हणाले की, भोजन शरीरासाठी आवश्यक आहे, तसेच आत्म्यासाठी भजन करणे आवश्यक आहे. 

'ध्यान' काय आहे?>> साऱ्या विचारांना विसरून जाणे हेच 'ध्यान' आहे. 

देशासमोरील सर्वात मोठी समस्या कोणती?>> अल्पसंख्याकवाद व बहुसंख्याकवाद हीच देशासमोरील मोठी समस्या आहे. एक वर्षासाठी हा वाद विसरा. देशांत क्रांती घडेल. 

आतंकवादाचे निदान काय?>> अनेकांतवाद आतंवादाचे निदान आहे. 

आपणास कोणत्या गोष्टीची चिंता वाटते?>> डॉलर व रुपयांची किंमत कमी होत आहे, याची मला चिंता नाही. मात्र माणसातील माणुसकी कमी होत आहे, याची मला चिंता आहे. 

समाजात काही संत क्षेत्रवाद करीत आहेत...>> जो समाजाला जोडतो तोच खरा संत. समाजाला तोडणाऱ्याला संत म्हणता येत नाही. 

मांसाहारी लोकांसाठी आपण कोणता सल्ला द्याल?>> मांसाहार करणाऱ्यांच्या पोटात जनावरांचे अवशेष असतात. ते आपल्या पोटाला स्मशानभूमी बनवतात. मांसाहार करणाऱ्यांनी संकल्प करावा की, आयुष्यभर शाकाहार करणार नाही. मांसाहाराच्या बळावर कोणीही जिवंत राहू शकत नाही. पाणी शाकाहारी आहे, मसाले शाकाही आहेत तसेच श्वासही शाकाहारी आहे. श्वास घेतला नाही तर जिवंत कोणी राहू शकत नाही. 

भूत आहे हे आपण मानता का?>> मी भूतकाळ मानतो, वर्तमानकाळ व भविष्यकाळही मानतो. 

मुनीश्री आपण एवढे कठीण जीवन का जगता?>> जगाला प्रकाश देण्यासाठी दिव्याला जळावे लागते तसेच आमचे जीवन आहे. 

दिगंबर, श्वेतांबर एक होऊ शकतील?>> जैन धर्मात पंथ वेगवेगळे असले तरी त्यांचे आराध्य तीर्थंकर एकच आहेत. पंच महाव्रत, महामंत्र एकच आहे. दिगंबर, श्वेतांबर जैन एक होऊ शकतात. दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथीसारख्या शब्दांना एक वर्षासाठी कचऱ्याच्या डब्यात टाका. जैन म्हणून जगा.  

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागर