शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

देशापुढील सर्वात मोठी समस्या अन् क्रांतीचा मंत्र; वाचा, मुनीश्री तरुण सागरजींचं नेमकं विवेचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 15:48 IST

२००८ मध्ये औरंगाबाद इथं राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा महोत्सव झाला होता. त्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवर गुरू-शिष्यांमध्ये प्रश्नोत्तरं रंगली होती.

राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचं आज पहाटे निधन झालं. दहा वर्षांपूर्वी, २००८ मध्ये औरंगाबाद इथं राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा महोत्सव झाला होता. त्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवर गुरू-शिष्यांमध्ये प्रश्नोत्तरं रंगली होती. शिष्यांच्या प्रश्नांना मुनीश्रींनी दिलेली उत्तरं आणि त्यांच्या मार्मिक टिप्पण्यांमधून त्यांच्या अलौकिक ज्ञानाची प्रचिती सगळ्यांनाच आली. या प्रश्नोत्तरांतील काही अंश... 

गुरुदीक्षा का घेतली जाते?>> जगात आकर्षण खूप आहे. त्यात भरकटत जाऊ नये म्हणून प्रत्येकाने 'लाईन ऑफ कंट्रोल' आखणे गरजेचे आहे. त्यासाठी गुरुदीक्षा घेणे आवश्यक असून गुरूमुळे जीवन सुरक्षित होते. 

दररोज भजन कशासाठी?>> दररोज भजन कशासाठी, असा प्रतिसवाल विचारत मुनीश्री म्हणाले की, भोजन शरीरासाठी आवश्यक आहे, तसेच आत्म्यासाठी भजन करणे आवश्यक आहे. 

'ध्यान' काय आहे?>> साऱ्या विचारांना विसरून जाणे हेच 'ध्यान' आहे. 

देशासमोरील सर्वात मोठी समस्या कोणती?>> अल्पसंख्याकवाद व बहुसंख्याकवाद हीच देशासमोरील मोठी समस्या आहे. एक वर्षासाठी हा वाद विसरा. देशांत क्रांती घडेल. 

आतंकवादाचे निदान काय?>> अनेकांतवाद आतंवादाचे निदान आहे. 

आपणास कोणत्या गोष्टीची चिंता वाटते?>> डॉलर व रुपयांची किंमत कमी होत आहे, याची मला चिंता नाही. मात्र माणसातील माणुसकी कमी होत आहे, याची मला चिंता आहे. 

समाजात काही संत क्षेत्रवाद करीत आहेत...>> जो समाजाला जोडतो तोच खरा संत. समाजाला तोडणाऱ्याला संत म्हणता येत नाही. 

मांसाहारी लोकांसाठी आपण कोणता सल्ला द्याल?>> मांसाहार करणाऱ्यांच्या पोटात जनावरांचे अवशेष असतात. ते आपल्या पोटाला स्मशानभूमी बनवतात. मांसाहार करणाऱ्यांनी संकल्प करावा की, आयुष्यभर शाकाहार करणार नाही. मांसाहाराच्या बळावर कोणीही जिवंत राहू शकत नाही. पाणी शाकाहारी आहे, मसाले शाकाही आहेत तसेच श्वासही शाकाहारी आहे. श्वास घेतला नाही तर जिवंत कोणी राहू शकत नाही. 

भूत आहे हे आपण मानता का?>> मी भूतकाळ मानतो, वर्तमानकाळ व भविष्यकाळही मानतो. 

मुनीश्री आपण एवढे कठीण जीवन का जगता?>> जगाला प्रकाश देण्यासाठी दिव्याला जळावे लागते तसेच आमचे जीवन आहे. 

दिगंबर, श्वेतांबर एक होऊ शकतील?>> जैन धर्मात पंथ वेगवेगळे असले तरी त्यांचे आराध्य तीर्थंकर एकच आहेत. पंच महाव्रत, महामंत्र एकच आहे. दिगंबर, श्वेतांबर जैन एक होऊ शकतात. दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथीसारख्या शब्दांना एक वर्षासाठी कचऱ्याच्या डब्यात टाका. जैन म्हणून जगा.  

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागर