शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

देशापुढील सर्वात मोठी समस्या अन् क्रांतीचा मंत्र; वाचा, मुनीश्री तरुण सागरजींचं नेमकं विवेचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 15:48 IST

२००८ मध्ये औरंगाबाद इथं राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा महोत्सव झाला होता. त्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवर गुरू-शिष्यांमध्ये प्रश्नोत्तरं रंगली होती.

राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचं आज पहाटे निधन झालं. दहा वर्षांपूर्वी, २००८ मध्ये औरंगाबाद इथं राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा महोत्सव झाला होता. त्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवर गुरू-शिष्यांमध्ये प्रश्नोत्तरं रंगली होती. शिष्यांच्या प्रश्नांना मुनीश्रींनी दिलेली उत्तरं आणि त्यांच्या मार्मिक टिप्पण्यांमधून त्यांच्या अलौकिक ज्ञानाची प्रचिती सगळ्यांनाच आली. या प्रश्नोत्तरांतील काही अंश... 

गुरुदीक्षा का घेतली जाते?>> जगात आकर्षण खूप आहे. त्यात भरकटत जाऊ नये म्हणून प्रत्येकाने 'लाईन ऑफ कंट्रोल' आखणे गरजेचे आहे. त्यासाठी गुरुदीक्षा घेणे आवश्यक असून गुरूमुळे जीवन सुरक्षित होते. 

दररोज भजन कशासाठी?>> दररोज भजन कशासाठी, असा प्रतिसवाल विचारत मुनीश्री म्हणाले की, भोजन शरीरासाठी आवश्यक आहे, तसेच आत्म्यासाठी भजन करणे आवश्यक आहे. 

'ध्यान' काय आहे?>> साऱ्या विचारांना विसरून जाणे हेच 'ध्यान' आहे. 

देशासमोरील सर्वात मोठी समस्या कोणती?>> अल्पसंख्याकवाद व बहुसंख्याकवाद हीच देशासमोरील मोठी समस्या आहे. एक वर्षासाठी हा वाद विसरा. देशांत क्रांती घडेल. 

आतंकवादाचे निदान काय?>> अनेकांतवाद आतंवादाचे निदान आहे. 

आपणास कोणत्या गोष्टीची चिंता वाटते?>> डॉलर व रुपयांची किंमत कमी होत आहे, याची मला चिंता नाही. मात्र माणसातील माणुसकी कमी होत आहे, याची मला चिंता आहे. 

समाजात काही संत क्षेत्रवाद करीत आहेत...>> जो समाजाला जोडतो तोच खरा संत. समाजाला तोडणाऱ्याला संत म्हणता येत नाही. 

मांसाहारी लोकांसाठी आपण कोणता सल्ला द्याल?>> मांसाहार करणाऱ्यांच्या पोटात जनावरांचे अवशेष असतात. ते आपल्या पोटाला स्मशानभूमी बनवतात. मांसाहार करणाऱ्यांनी संकल्प करावा की, आयुष्यभर शाकाहार करणार नाही. मांसाहाराच्या बळावर कोणीही जिवंत राहू शकत नाही. पाणी शाकाहारी आहे, मसाले शाकाही आहेत तसेच श्वासही शाकाहारी आहे. श्वास घेतला नाही तर जिवंत कोणी राहू शकत नाही. 

भूत आहे हे आपण मानता का?>> मी भूतकाळ मानतो, वर्तमानकाळ व भविष्यकाळही मानतो. 

मुनीश्री आपण एवढे कठीण जीवन का जगता?>> जगाला प्रकाश देण्यासाठी दिव्याला जळावे लागते तसेच आमचे जीवन आहे. 

दिगंबर, श्वेतांबर एक होऊ शकतील?>> जैन धर्मात पंथ वेगवेगळे असले तरी त्यांचे आराध्य तीर्थंकर एकच आहेत. पंच महाव्रत, महामंत्र एकच आहे. दिगंबर, श्वेतांबर जैन एक होऊ शकतात. दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथीसारख्या शब्दांना एक वर्षासाठी कचऱ्याच्या डब्यात टाका. जैन म्हणून जगा.  

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागर