शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 06:12 IST

‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे. 

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने १३६ जागा जिंकून भाजपचा दारूण पराभव केला तर भाजपला अवघ्या ६५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकांत बजरंग दलावरील बंदीबाबतचा प्रचारात गाजलेला मुद्दा भाजपला तारू शकला नाही. ‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे. 

बजरंगबलीचा नारा देऊन मतदान करावे व काँग्रेसला धडा शिकवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते; पण, त्या पक्षाला हनुमानाने तारले नाही. कर्नाटकच्या मतदारांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अधिक भावल्याचे निवडणूक निकालांतून दिसून आले. सलग एकाच पक्षाकडे सत्ता न सोपविण्याची कर्नाटकातील सुमारे ३८ वर्षे जुनी परंपरा या निवडणुकांतही कायम राहिली. कर्नाटकमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. भाजप जनतेच्या कल्याणासाठी यापुढे अधिक जोमाने काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

बजरंग दलाचा मुद्दा कुचकामीबजरंग दल, पीएफआयसारख्या विद्वेष पसरविणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याचा विचार काँग्रेसने जाहीरनाम्यात व्यक्त केला होता. त्या मुद्द्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व नेत्यांनी भांडवल करून प्रचारात काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. मात्र, बजरंग दलाचा हा मुद्दा अजिबात प्रभावी न ठरल्याचे निवडणूक निकालांतून दिसून आले.

हिमाचल प्रदेशनंतर कर्नाटकही गेलेगेल्या डिसेंबर महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकांत भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर आता कर्नाटकमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली. दक्षिण भारतात भाजपची सत्ता असलेले एकमेव राज्य त्या पक्षाला गमवावे लागले आहे. 

सीमावर्ती भागातही काँग्रेस -महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील बेळगाव,  विजयपूर, कलबुर्गी, बिदर आणि बागलकोट या पाच जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीनेही या निवडणुकीत चांगलाच जोर लावला, मात्र त्यांना फार काही प्रभावी कामगिरी करता आली नाही. यंदाच्या निवडणुकीत या भागातील मतदारांनी भाजपला नाकारले असून कॉंग्रेसने गतवर्षीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. 

-  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी ११ विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेसने मुसंडी मारली, तर भाजपला सात जागांवर समाधान मानावे लागले.  -  विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील ८ पैकी सहा जागांवर कॉंग्रेसने बाजी मारली, तर भाजप आणि जेडीएसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. -  बागलकोट : ‘एज्युकेशन हब’असलेल्या बागलकोट जिल्ह्यातील ७ पैकी ५ जागा काँग्रेसने खिशात टाकल्या, भाजपला दोन जागी यश मिळाले. -  कलबुर्गी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे ‘होम ग्राउंड’असलेल्या कलबुर्गी जिल्ह्यात ८ पैकी ६ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. भाजप आणि जेडीएसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. -  बिदर : बिदरमधील ६ पैकी चार जागांवर भाजप, तर दोन ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाला. जेडीएसला बिदर जिल्ह्यात एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

जय-पराजयाची कारणे

काँग्रेस --  राहुल यांच्या भारत जोडो यात्रेने जिंकली मने-  ४० टक्के कमिशनवाले सरकार हा काँग्रेसने केलेला प्रभावी प्रचार-  काँग्रेसने राष्ट्रीय प्रश्नांपेक्षा दिला स्थानिक मुद्द्यांवर अधिक भर-  नेहमीच प्रबळ असलेला प्रस्थापितविरोधी प्रवाह यावेळीही कामी आला

भाजप --  शिक्षणसंस्थांमधील हिजाबबंदी, ४ टक्के मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हे राजकीयदृष्ट्या भाजपला महागात पडले-  मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे प्रभावी नसल्याची सातत्याने होत असलेली टीका-  भाजपने तिकीट नाकारलेले जगदीश शेट्टर तसेच काही नेते पक्षातून बाहेर पडले. त्या घटनाही पराभवास कारणीभूत. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी