शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर उपोषण सोडले; महापंचायतमध्ये घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 19:50 IST

शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून उपोषण संपवण्यात आल्याचे डल्लेवाल म्हणाले. काही दिवसापासून त्यांना शेतकऱ्यांनी उपोषण सोडण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांच्या एमएसपी आणि इतर मागण्यांसाठी १३१ दिवसांपासून उपोषण करणारे संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर आज उपोषण थांबवले आहे. फतेहगढ साहिब येथील सरहिंद धान्य बाजारात शेतकऱ्यांच्या महापंचायतीत त्यांनी ही घोषणा केली आणि पाणी घेतले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून उपोषण संपवण्यात आल्याचे डल्लेवाल यांनी जाहीर केले. 

गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबर २०२४ पासून उपोषण सुरू केले होते. काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते.

'इंग्रजीत स्वाक्षरी करता, तेव्हा कुठे जातो भाषेचा अभिमान?', पीएम मोदींचा सीएम स्टॅलिनवर निशाणा

४ मे रोजी चंदीगडमध्ये शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री चौहान  यांनी सांगितले होते. यापूर्वी, पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवले होते की डल्लेवाल यांनी त्यांचे उपोषण सोडले आहे, शेतकरी संघटनांनी सरकारचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले होते.

जगजीत सिंग यांनी श्री फतेहगड साहिब येथील शेतकऱ्यांच्या महापंचायतीलाही संबोधित केले. त्यांनी सांगितले की एम.एस.पी. आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत त्यांचा लढा सुरूच राहील. डल्लेवाल म्हणाले की, सरकारने आमच्यावर मोठा हल्ला केला आहे. चळवळ सुरू आहे, सुरू राहील आणि शेवटपर्यंत सुरू राहील. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असंही डल्लेवाल म्हणाले.

डल्लेवाल म्हणाले की, पंजाब सरकारने केंद्र सरकारसमोर झुकले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केवळ शेतकऱ्यांवर हल्ला केला नाही तर संपूर्ण पंजाबच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. या सरकारला मुलींचा, मातांचा किंवा मोठ्यांचा आदर करण्याची जाणीव नाही. आंदोलन सुरूच आहे. पुढे काय होईल हे मला माहित नाही. शेतकऱ्यांनी अपील केले होते, म्हणून मी उपोषण सोडत आहे, असंही डल्लेवाल म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाब