शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

फणस बनले केरळचे राज्यफळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 08:37 IST

केरळमध्ये दरवर्षी ३० कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते

तिरूवनंतपूरम : वरून काटे व आत गोड, रसाळ गरे असलेल्या फणसाला केरळ राज्याने बुधवारी राज्यफळाचा मान बहाल केला. राज्याचे कृषिमंत्री व्ही. एस. सुनीलकुमार यांनी विधानसभेत ही घोषणा केली. केरळमध्ये दरवर्षी ३० कोटींहून अधिक फणसांचे उत्पादनहोते. केरळचा फणस आणि त्यापासून बनविलेल्या उत्पादनांचा देशभर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे सांगून सुनीलकुमार म्हणाले की, यातून सुमारे १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. झाडाला लागणारे सर्वांत मोठे फळ अशी ओळख असलेल्या फणसाला हा मान देणारे केरळ हे पहिले राज्य असले तरी फणसाच्या उत्पादनात केरळचा देशात सहावा क्रमांक लागतो. देशभरात वर्षाला सुमारे १९०० हजार टन फणसाचे उत्पादन होत असले तरी त्यापैकी सुमारे ३० टक्के फणस ग्राहकापर्यंत पोहोचण्याआधीच सडून जातात. म्हणूनच फणसावर प्रक्रिया करून टिकाऊ उत्पादने तयार करण्यास खूप वाव आहे. २० राज्यांमध्ये फणस पिकत असले तरी त्रिपुराचा क्रमांक त्यात पहिला आहे. त्याखालोखाल ओरिसा, आसाम, प. बंगाल, कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, झारखंड व मध्य प्रदेश ही सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत. उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात १५वा क्रमांक लागतो.

टॅग्स :Keralaकेरळ