शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'बेकायदा घुसखोरांना देशाबाहेर काढणे हा जणू विनोद झालाय!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 06:40 IST

आसाम सरकारची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी

नवी दिल्ली : आसाममध्ये वास्तव्य करणाऱ्या बेकायदा घुसखोरांची नेमकी ओळख निश्चित करण्याची प्रस्थापित कायदेशीर व्यवस्था राबविण्यात आणि यातील जे घुसखोर ‘विदेशी नागरिक’ ठरतील त्यांना तत्परतेने देशाबाहेर काढण्यात ढिसाळपणा होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी आसाम सरकारची खरडपट्टी काढली.सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने घुसखोरांना देशाबाहेर काढणे हा एक निव्वळ विनोद झाला असल्याचे कडवट भाष्य केले. आसाम सरकारच्या वतीने काम पाहणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना उद्देशून सरन्यायाधीश म्हणाले की, या विषयाचे तुम्हाला किती गांभीर्य आहे हे तुम्हाला माहिती देण्यासाठी कोण अधिकारी आला आहे व जो प्रतिज्ञापत्र करत आहे (दिल्लीतील निवासी आयुक्त) त्यावरूनच दिसते.आसाम सरकारला उद्देशून सरन्यायाधीश म्हणाले की, बेकायदा घुसखोरांच्या रूपाने आसामपुढे बाह्य आक्रमणाचा संभाव्य धोका आ वासून उभा आहे, असा स्पष्ट इशारा या न्यायालयाने सन २००५मधील निकालात स्पष्टपणे दिला होता. तरी सरकार हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते.आत्तापर्यंत किती लोकांना ‘परकीय नागरिक’ घोषित करण्यात आले आहे, त्यांच्यापैकी कितीजणांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यात आले आहे, किती जणांना स्थानबद्धता शिबिरांमध्ये ठेवले आहे, हे काम करण्यासाठी असलेली न्यायाधिकरणे पुरेशी आहेत की त्यांची संख्या वाढवावी लागेल इत्यादी मुद्द्यांवर न्यायालयाने सॉलिसिटर जनरलवर प्रश्नांची सरबत्ती केली. या सर्वाची सविस्तर माहिती देणारे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी २८ मेपर्यंतचा वेळ देण्यात आला.५० हजार परकीय नागरिकगेल्या १० वर्षांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ५० हजार घुसखोरांना ‘परकीय नागरिक’ घोषित करण्यात आले आहे. यापैकी ९०० ‘परकीय नागरिकांना’ परत पाठविण्याच्या प्रतीक्षेत एकूण सहा शिबिरांमध्ये स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आसाम सरकारने न्यायालयास दिली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय