शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

'बेकायदा घुसखोरांना देशाबाहेर काढणे हा जणू विनोद झालाय!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 06:40 IST

आसाम सरकारची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी

नवी दिल्ली : आसाममध्ये वास्तव्य करणाऱ्या बेकायदा घुसखोरांची नेमकी ओळख निश्चित करण्याची प्रस्थापित कायदेशीर व्यवस्था राबविण्यात आणि यातील जे घुसखोर ‘विदेशी नागरिक’ ठरतील त्यांना तत्परतेने देशाबाहेर काढण्यात ढिसाळपणा होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी आसाम सरकारची खरडपट्टी काढली.सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने घुसखोरांना देशाबाहेर काढणे हा एक निव्वळ विनोद झाला असल्याचे कडवट भाष्य केले. आसाम सरकारच्या वतीने काम पाहणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना उद्देशून सरन्यायाधीश म्हणाले की, या विषयाचे तुम्हाला किती गांभीर्य आहे हे तुम्हाला माहिती देण्यासाठी कोण अधिकारी आला आहे व जो प्रतिज्ञापत्र करत आहे (दिल्लीतील निवासी आयुक्त) त्यावरूनच दिसते.आसाम सरकारला उद्देशून सरन्यायाधीश म्हणाले की, बेकायदा घुसखोरांच्या रूपाने आसामपुढे बाह्य आक्रमणाचा संभाव्य धोका आ वासून उभा आहे, असा स्पष्ट इशारा या न्यायालयाने सन २००५मधील निकालात स्पष्टपणे दिला होता. तरी सरकार हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते.आत्तापर्यंत किती लोकांना ‘परकीय नागरिक’ घोषित करण्यात आले आहे, त्यांच्यापैकी कितीजणांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यात आले आहे, किती जणांना स्थानबद्धता शिबिरांमध्ये ठेवले आहे, हे काम करण्यासाठी असलेली न्यायाधिकरणे पुरेशी आहेत की त्यांची संख्या वाढवावी लागेल इत्यादी मुद्द्यांवर न्यायालयाने सॉलिसिटर जनरलवर प्रश्नांची सरबत्ती केली. या सर्वाची सविस्तर माहिती देणारे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी २८ मेपर्यंतचा वेळ देण्यात आला.५० हजार परकीय नागरिकगेल्या १० वर्षांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ५० हजार घुसखोरांना ‘परकीय नागरिक’ घोषित करण्यात आले आहे. यापैकी ९०० ‘परकीय नागरिकांना’ परत पाठविण्याच्या प्रतीक्षेत एकूण सहा शिबिरांमध्ये स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आसाम सरकारने न्यायालयास दिली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय