शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
2
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
3
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
5
फक्त बचत नाही, 'स्मार्ट' गुंतवणूक करा! करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा!
6
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
7
शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड
8
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
9
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
10
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
11
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
12
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
13
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
14
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
15
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
16
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
17
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
18
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
19
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!

पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत लावलं जातं लग्न; काय आहे 'करेवा विवाह'?, दिल्ली हायकोर्टासमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:40 IST

भारतात लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आणि कोर्ट मॅरेजप्रमाणेच करेवा विवाह हा लग्नाचा भाग आहे परंतु हा इतर प्रथेपेक्षा वेगळा आहे

नवी दिल्ली - नुकतेच दिल्ली हायकोर्टात एक प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे ते म्हणजे करेवा विवाह...करेवा विवाहातून जन्माला आलेल्या मुलाला कायदेशीर अधिकार मिळावा की नाही यावर तपास करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिलेत. या विवाहातून जन्मलेल्या मुलांना तेच अधिकार मिळायला हवेत जे अन्य वैध विवाहातून जन्मलेल्या मुलांना मिळतात यावर कोर्ट विचार करत आहे. परंतु करेवा विवाह नेमका काय असतो, ज्यातून दिल्ली हायकोर्टासमोर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे हे जाणून घेऊया..

काय असतो करेवा विवाह?

उत्तर भारतात विशेषत: हरियाणा, पंजाब येथे अशी परंपरा आजही समाजात पाहायला मिळते. ही परंपरा आहे करेवा विवाह..यादव समुदायात ही परंपरा पाहायला मिळते. या प्रथेत दीर भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीसोबत लग्न करतो. ही परंपरा राजस्थान, उत्तर प्रदेशातील काही भागात दिसून येते. त्याचा हेतू कुटुंब एकजूट ठेवणे, कौटुंबिक संपत्ती विखुरण्यापासून वाचवणे, विधवा महिलेला आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देणे हे आहे.

भारतात लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आणि कोर्ट मॅरेजप्रमाणेच करेवा विवाह हा लग्नाचा भाग आहे परंतु हा इतर प्रथेपेक्षा वेगळा आहे. त्यात नवरा आणि नवरी वेगवेगळ्या कुटुंबातील नव्हे तर एकाच कुटुंबाचा भाग असतात. जुन्या काळात विधवा महिलांना समाजात जगताना अनेक अडचणी यायच्या. त्यात करेवा विवाह ना केवळ त्यांना सुरक्षा द्यायचे तर समाजात सन्मानही दिला जायचा. करेवा विवाहात जमीन आणि घर कुटुंबातच राहते. बऱ्याचदा हे लग्न विधवा महिलेच्या मर्जीविरोधात केले जाते. त्यामुळे महिलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत प्रश्न निर्माण होतो. 

हिंदू विवाह अधिनियमात 'करेवा'बाबत स्पष्ट उल्लेख नाही

करेवा विवाह ना सामान्य लग्नासारखे आहे ना आधुनिक लग्नप्रणालीत त्याचा उल्लेख होतो. ही प्रथा केवळ समाजाच्या काही मान्यतांवर टिकून आहे परंतु यातून जन्मलेल्या मुलांच्या अधिकारावरून कायदेशीर पेच निर्माण होतात. हिंदू विवाह अधिनियम १९५५ मध्येही यावर स्पष्ट उल्लेख नाही. परंतु पंजाब आणि हरियाणासारख्या राज्यात या विवाह प्रथेला मान्यता देण्यात आली आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmarriageलग्न