शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

डोकलाम विवाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व क्षी जिनपिंग यांच्या बैठकीत असा निघाला वादावर तोडगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 23:13 IST

हॅम्बर्गमध्ये जी 20 संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान डोकलाम विवाद सोडण्यावर चर्चा झाली होती.

नवी दिल्ली - हॅम्बर्गमध्ये जी 20 संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान डोकलाम विवाद सोडण्यावर चर्चा झाली होती. याचा खुलासा एका नवीन पुस्तकात करण्यात आला होता. धोरणात्मक बाबींचे अभ्यासक नितीन ए. गोखले यांनी  'सिक्यॉरिंग इंडिया द मोदी वे' नावाच्या पुस्तकात केला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते शुक्रवारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात गोखले यांनी लिहिले आहे की, जी 20 संमेलनादरम्यान मोदी क्षी जिनपिंग यांच्याकडे स्वतःहून गेल्यानंतर बैठक झाली होती.   

पुस्तकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, या बैठकीचे साक्षीदार असलेल्या भारतीय राजदूत अधिका-यांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षी जिनपिंग यांच्यासोबत अघोषित बैठक घेतल्यामुळे चीनचे सदस्य मंडळ आश्चर्यचकित झाले. या बैठकीदरम्यान मोदी यांनी क्षी जिनपिंग यांना सल्ला दिला की भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि स्टेट सल्लागार यांग जीची यांना डोकलाम विवादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली पाहिजे. यावेळी मोदींनी क्षी जिनपिंग यांना सांगितले की, आपले धोरणात्मक संबंध डोकलामसारख्या मुद्याहून अधिक मोठे आहेत. 

या भेटीनंतर 15 दिवसांनंतर, डोवाल प्रस्तावित ब्रिक्स एनएसए बैठकीसाठी रवाना झाला होते. यादरम्यान, भारतानं राजदूत विजय गोखले यांच्या नेतृत्वात चीनमध्ये 38 बैठका घेतल्या. यावेळी भारतीय सदस्य दलाला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनएसए डोवाल यांच्याकडून स्पष्ट निर्देश मिळाले होते. पुस्तकातील माहितीनुसार, भारत स्वतःच्या बाजूनं ठोस भूमिकेत राहिल.'यानंतर, चीननं डोकलाम क्षेत्रात मार्गिक निर्माण करण्याचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. 

2 महिने सुरू होता लष्करी तिढा  भारत, चीन व भूतान यांच्या सीमा जेथे मिळतात त्या डोकलाम पठारावरून भारत व चीन यांच्यात गेले दोन महिने सुरू असलेला लष्करी तिढा राजनैतिक वाटाघाटींतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून,त्यानुसार भारताने त्या ठिकाणाहून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली . चीनमधील ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने  ही घोषणा केली होती. सैन्याची ही माघार उभयपक्षी सहमतीने होत असल्याचे भारताने म्हटले असले तरी चीनने मात्र भारताने एकतर्फी सैन्य मागे घेतल्याचा दावा केला. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी याविषयी अधिक तपशील देण्यास नकार दिला. मात्र सैन्य माघारी घेण्यावर सहमती झाली आहे व त्यानुसार सैन्य मागे घेतले जात आहे, यास या सूत्रांनी दुजोरा दिला होता. बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्रालय, ‘पीपल्स डेली’ व ‘शिन्हुआ’ वृत्तसंस्था तसेच चायना ग्लोबल टेलिव्हिजन या सर्वांनी डोकलामचा तिढा सोडवण्यावर द्विपक्षीय सहमती झाल्याचे जाहीर केले. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त भारताने सैन्य मागे घेतले आहे. सोमवारी दुपारपर्यंत डोकलाम येथून भारताने आपले सर्व सैनिक व लष्करी सामग्री माघारी घेऊन सीमेपलीकडे नेल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले. चीन मात्र या प्रदेशावरील आपले सार्वभौमत्व अधोरेखित करण्यासाठी तेथे सैन्य ठेवून पहारा देतच राहील, असा दावाही त्यांनी केला.

काय होता नेमका वाद?या सीमेवर भूतानच्या मदतीसाठी भारतीय सैन्य तैनात आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी भूतानच्या हद्दीत सुरू केलेले रस्त्याचे बांधकाम भारतीय सैनिकांनी हस्तक्षेप करून 18 जून रोजी बंद पाडले तेव्हापासून हा तिढा सुरू आहे. तो प्रदेश आपलाच असल्याचा दावा करून चीनने भारतावर घुसखोरीचा आरोप केला होता. तेव्हापासून भारताचे 350 व चीनचे 300 सैनिक डोकलाम पठारावर आमने-सामने आहेत.