शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:41 IST

'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली.'

Nirmala Sitharaman Slams Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान भाजपवर जोरदार टीका केली. यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल यांचे दावे फेटाळून लावत UPA सरकारच्या काळात काहीही कामे झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

यूपीए सरकारच्या काळात देशाचे नुकसानआजतकशी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली. यूपीए सरकारने दहा वर्षांत देशाचे जेवढे नुकसान केले, ते साफ करायलाच आम्हाला चार-पाच वर्षे लागली. राहुल गांधींना बँका आणि व्यवसायांच्या खराब स्थितीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.' 

बँकांचे नुकसान आम्ही भरून काढत आहोत!'यूपीएच्या दहा वर्षांच्या काळात उद्योगपतींनी नोकऱ्यांना टाळे ठोकले होते. त्यांच्या कार्यकाळात बँकांचे खूप नुकसान झाले आणि बँकांमुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेचेही नुकसान झाले. ज्यांना बँकेचे फायदे मिळाले, ते देश सोडून गेले. त्यांच्या काळात पैसे घेऊन पळून गेलेल्यांची मालमत्ता आम्ही जप्त केली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर आज 18-22 हजार कोटी रुपये परत दिले जात आहेत. त्यामुळेच राहुल गांधींना बोलण्याचा अधिकार नाही,' असा हल्लाबोल निर्मला सीतारामन यांनी केला.

चीनने भारताची जमीन बळकावली?मेक इन इंडिया उपक्रम अपयशी ठरला, त्यामुळेच चीनने भारतीय भूमीवर कब्जा केला, या राहुल गांधींच्या दाव्यावर सीतारामन म्हणाल्या, 'त्यांच्या आजोबांच्या काळात चीन आणि पाकिस्तानने लडाखमध्ये किती भूभाग बळकावला होता? सामंजस्य करार करताना तुम्ही चीनला आपली जमीन परत करण्यास सांगितले होते का?' असा सवालही निर्मला सीतारामन यांनी विचारला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा