शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:41 IST

'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली.'

Nirmala Sitharaman Slams Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान भाजपवर जोरदार टीका केली. यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल यांचे दावे फेटाळून लावत UPA सरकारच्या काळात काहीही कामे झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

यूपीए सरकारच्या काळात देशाचे नुकसानआजतकशी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली. यूपीए सरकारने दहा वर्षांत देशाचे जेवढे नुकसान केले, ते साफ करायलाच आम्हाला चार-पाच वर्षे लागली. राहुल गांधींना बँका आणि व्यवसायांच्या खराब स्थितीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.' 

बँकांचे नुकसान आम्ही भरून काढत आहोत!'यूपीएच्या दहा वर्षांच्या काळात उद्योगपतींनी नोकऱ्यांना टाळे ठोकले होते. त्यांच्या कार्यकाळात बँकांचे खूप नुकसान झाले आणि बँकांमुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेचेही नुकसान झाले. ज्यांना बँकेचे फायदे मिळाले, ते देश सोडून गेले. त्यांच्या काळात पैसे घेऊन पळून गेलेल्यांची मालमत्ता आम्ही जप्त केली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर आज 18-22 हजार कोटी रुपये परत दिले जात आहेत. त्यामुळेच राहुल गांधींना बोलण्याचा अधिकार नाही,' असा हल्लाबोल निर्मला सीतारामन यांनी केला.

चीनने भारताची जमीन बळकावली?मेक इन इंडिया उपक्रम अपयशी ठरला, त्यामुळेच चीनने भारतीय भूमीवर कब्जा केला, या राहुल गांधींच्या दाव्यावर सीतारामन म्हणाल्या, 'त्यांच्या आजोबांच्या काळात चीन आणि पाकिस्तानने लडाखमध्ये किती भूभाग बळकावला होता? सामंजस्य करार करताना तुम्ही चीनला आपली जमीन परत करण्यास सांगितले होते का?' असा सवालही निर्मला सीतारामन यांनी विचारला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा