शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मतदारांशी संपर्क साधून यशस्वी अंदाज वर्तवणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 06:14 IST

देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवण्यात भलेभले दिग्गज अपयशी ठरले असताना ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने वर्तवलेला अंदाज अचूक ठरला आहे.

- खलील गिरकर देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवण्यात भलेभले दिग्गज अपयशी ठरले असताना ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने वर्तवलेला अंदाज अचूक ठरला आहे. याबाबत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : लोकसभा निकालाबाबत अनेकांचे अंदाज पूर्णत: चुकत असताना तुमच्या संस्थेने वर्तवलेला अंदाज बरोबर कसा आला, यामागे काय वेगळे तंत्र आहेउत्तर : आमच्या संस्थेला निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवण्याचा चांगला अनुभव आहे. आम्ही २०१३ पासून विविध ३६ निवडणुकांचे निकाल वर्तवले असून ते ३४ वेळा योग्य ठरले आहेत. आमची कामाची पद्धत इतरांपेक्षा काहीशी वेगळी आहे. आम्ही अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करत आलो आहोत. त्यामुळे आमचे अंदाज तंतोतंत बरोबर येतात.प्रश्न : लोकसभा निवडणूक निकालाचे भाकीत वर्तवण्यासाठी काय परिश्रम घेतले होते?उत्तर : आम्ही आमच्या सहकाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले होते. आमच्या सहकाऱ्यांनी देशातील लोकसभा मतदारसंघात जाऊन विविध वयोगटातील व विविध जातीय, राजकीय, सामाजिक, आर्थिक गटाच्या नागरिकांसोबत संवाद साधला आहे. देशभरात ७ लाख ४२ हजार १८७ जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आमच्या ५४२ सदस्यांच्या टीमने यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. आम्ही केवळ मतदानोत्तर अंदाज वर्तवले होते. १२ एप्रिल ते १९ मे यादरम्यान आमची टीम देशभरात कार्यरत होती. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची आपली वेगळी ओळख असते. त्यांचे वेगळे वैशिष्ट्य असते. त्याचा अभ्यास करून आमचे सहकारी काम करतात. सर्वप्रथम आम्ही तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचतो. त्यांच्याशी संवाद साधतो व त्यांच्या भावना जाणून घेतो. त्यानंतर प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांची मुलाखत घेतो. प्रत्येक मतदारसंघात सरासरी १३७० जणांशी आम्ही संवाद साधला.‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने एनडीएला ३३९ ते ३६५ जागा व यूपीएला ७७ ते १०८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता.>अचूक अंदाज‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व बहुजन समाजवादी पक्षाच्या आघाडीला १० ते १६ जागा मिळण्याचे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात या राज्यात सप-बसप आघाडीला १५ जागा मिळाल्या आहेत. इतरांना ५९ ते ७९ जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. प्रत्यक्षातील निकालाने या भाकिताचे अचूकपण सिद्ध केले आहे.>१९९३ पासूनच्या संघर्षाला यशसन १९९३ मध्ये मध्य प्रदेशच्या एका गावातून मुंबईत आलेल्या गुप्ता यांनी इतरांप्रमाणे संघर्ष करत आपली मार्गक्रमणा ्रकरण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी ते दिल्लीत काही काळ काम करत होते. २०१३ पासून त्यांनी निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत ३६ निवडणुकांच्या निकालाचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ही ३७ वी वेळ होती. आतापर्यंत त्यांचे दोन वेळा अंदाज चुकले आहेत. इतर सर्व अंदाज बरोबर आले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी