शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पक्षनेतृत्वाचा विश्वास आणि देवाच्या कृपेशिवाय हे शक्य नाही - निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 21:34 IST

पक्षनेतृत्वाचा विश्वास आणि देवाच्या कृपेने मला इतक्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली आहे', अशी भावना देशाच्या नव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे

नवी दिल्ली, दि. 3 - पक्षनेतृत्वाचा विश्वास आणि देवाच्या कृपेने मला इतक्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली आहे', अशी भावना देशाच्या नव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. मी भारावून विनम्र झाले आहे. ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकून विश्वास दाखविल्याबद्दल मी पंतप्रधानांची ऋणी आहे. जे सतत मनात येते त्याचा मी आता देशसेवेसाठी उपयोग करू शकेन. एका लहानशा शहरातून आलेल्या आणि नेतृत्वाच्या पाठिंब्याने पक्षात विविध पदांवर काम केलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीवर एवढी मोठी जबाबदारी टाकली जाते तेव्हा वाटते की, खरंच ही वैश्विक कृपा आहे. त्याशिवाय हे शक्य नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पासून मोदीजींच्या कार्यशैलीशी मी परिचित आहे. महिलाही तेवढ्याच क्षमतेने काम करू शकता, त्यांना त्यांचा योग्य वाटा द्यायला हवा, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. असेही त्या पुढे म्हणाल्या.

शपथविधी सोहळ्यानंतर सीतारामन यांनी माध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नसल्याचेही त्या म्हणाल्या. वाणिज्य मंत्रिपदावरील कारभारावर विरोधकांकडून टीका होत असल्याकडे लक्ष वेधले असता अशा टीकेने मी डगमगणार नाही. टीकेला सामोरे जाऊन त्यातून योग्य तो धडा घ्यायचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, असे सीतारामन म्हणाल्या.

निर्मला सितारामन यांच्या रूपाने संरक्षणमंत्री पदाला अत्यंत कार्यक्षम उत्तराधिकारी मिळाला आहे. त्या ती भूमिका समर्तपणे बजावतील, याची मला खात्री आहे. व्यापार खात्याचे काम उत्तमपणे केले म्हणून सितारामन यांच्यावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. या पदावर एक स्त्री म्हणूनही त्यांची नेमणूक लक्षणीय आहे. असे वित्तंतमंत्री अरुण जेटली म्हणाले.

आज सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करताना निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये निर्मला सीतारामन यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली होती.

निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ आँगस्ट १९५९ रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला. तामिळनाडूमध्ये बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीमधील जवाहरलाल नँशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. तेथे एक हुशार विद्यार्थिनी असा लौकिक त्यांनी मिळवला. परराष्ट्र संबंधात पी. एचडी पदवी मिळवल्यावर त्यांनी प्राइसवाँटर कूपर्स आणि बीबीसीमध्ये काही काळ काम केले. निर्मला सीतारामन राष्ट्रीय महिला आयोगाच्याही सदस्या होत्या. आंध्र प्रदेशातील प्रणवा स्कूलच्या संस्थापक सदस्या आहेत. 2006 साली त्या भाजपाच्या प्रवक्तेपदी निवडल्या गेल्या. उत्तम इंग्लिश, सफाईदार मुद्दे मांडणे यामुळे त्या भाजपाची इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर बाजू मांडणाऱ्या प्रवक्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. २०१४ साली त्या केंद्रीय मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या राज्यमंत्री झाल्या. त्या सध्या कर्नाटकमधून राज्यसभेत निवडून गेल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार