शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे तर केंद्र सरकारचे कर्तव्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 09:50 IST

सुप्रीम कोर्ट; भरपाईबाबत सहा आठवड्यांत मार्गदर्शक तत्वे तयार करा

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर भरपाईबाबतच्या याचिकांची सुनावणी झाली

नवी दिल्ली : कोरोनाने मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांना भरपाई देण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारने सहा आठवड्यांच्या आत तयार करावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

न्यायालयाने सांगितले की, रुग्णांच्या वारसदारांना किमान किती भरपाई द्यावी याची रक्कम आम्ही निश्चित करणार नाही. ते काम सरकारने करायचे आहे. आपत्तीत लोकांना मदत देणे हे सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे असलेले कर्तव्य या संस्थेने पार पाडल्याचे दिसत नाही असेही न्यायालयाने सुनावले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर भरपाईबाबतच्या याचिकांची सुनावणी झाली. कोरोनामुळे किंवा कोरानातून बरे झाल्यानंतरही उद्भवलेल्या इतर विकारांमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये भरपाई द्यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना द्यावा अशी विनंती याबाबतच्या याचिकांमध्ये करण्यात आली होती. मात्र अशी भरपाई दिल्यास सरकारी तिजोरीवर मोठा ताण येईल. त्यामुळे असा निर्णय घेणे शक्य होणार नाही असे केंद्र सरकारने न्यायालयाला याआधीच सांगितले होते. 

आपत्तीचे नियम लागू करण्याची मागणीn कोरोना साथीला राष्ट्रीय आपत्तीबाबतचे सर्व नियम लागू करावेत व त्याप्रमाणे कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी अशी मागणी काही संस्थांनी केंद्राकडे केली होती. n पण त्यावर केंद्र सरकारने फारसा प्रतिसाद न दिल्याने या संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

पैसा अपुरा पडण्याची भीती  

n केंद्राने म्हटले आहे की, कोरोना बळींच्या वारसदारांना भरपाई दिल्यास कोरोना उपचारांसाठी व इतर अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीकरिता पैसा अपुरा पडेल. n आमच्याकडे असलेल्या संसाधनांना काही मर्यादा आहेत. धोरणात्मक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाला केली होती. 

यूएईमध्ये स्पुतनिक व्ही ९७% परिणामकारकसंयुक्त अरब अमिरातीत स्पुतनिक व्ही लस संसर्गावर ९७.८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा रशियन संस्थेने केला आहे. 

मागील ८७ दिवसांत सर्वात कमी मृत्यूंची नोंद 

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनामुळे ८१७ जण मरण पावले असून हा मागील ८७ दिवसांतला सर्वात कमी आकडा आहे. तसेच ४५ हजारांहून जास्त नवे रुग्ण सापडले असून ६० हजार लोक बरे झाले. सलग ४८व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण जास्त होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार