शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे तर केंद्र सरकारचे कर्तव्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 09:50 IST

सुप्रीम कोर्ट; भरपाईबाबत सहा आठवड्यांत मार्गदर्शक तत्वे तयार करा

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर भरपाईबाबतच्या याचिकांची सुनावणी झाली

नवी दिल्ली : कोरोनाने मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांना भरपाई देण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारने सहा आठवड्यांच्या आत तयार करावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

न्यायालयाने सांगितले की, रुग्णांच्या वारसदारांना किमान किती भरपाई द्यावी याची रक्कम आम्ही निश्चित करणार नाही. ते काम सरकारने करायचे आहे. आपत्तीत लोकांना मदत देणे हे सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे असलेले कर्तव्य या संस्थेने पार पाडल्याचे दिसत नाही असेही न्यायालयाने सुनावले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर भरपाईबाबतच्या याचिकांची सुनावणी झाली. कोरोनामुळे किंवा कोरानातून बरे झाल्यानंतरही उद्भवलेल्या इतर विकारांमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये भरपाई द्यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना द्यावा अशी विनंती याबाबतच्या याचिकांमध्ये करण्यात आली होती. मात्र अशी भरपाई दिल्यास सरकारी तिजोरीवर मोठा ताण येईल. त्यामुळे असा निर्णय घेणे शक्य होणार नाही असे केंद्र सरकारने न्यायालयाला याआधीच सांगितले होते. 

आपत्तीचे नियम लागू करण्याची मागणीn कोरोना साथीला राष्ट्रीय आपत्तीबाबतचे सर्व नियम लागू करावेत व त्याप्रमाणे कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी अशी मागणी काही संस्थांनी केंद्राकडे केली होती. n पण त्यावर केंद्र सरकारने फारसा प्रतिसाद न दिल्याने या संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

पैसा अपुरा पडण्याची भीती  

n केंद्राने म्हटले आहे की, कोरोना बळींच्या वारसदारांना भरपाई दिल्यास कोरोना उपचारांसाठी व इतर अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीकरिता पैसा अपुरा पडेल. n आमच्याकडे असलेल्या संसाधनांना काही मर्यादा आहेत. धोरणात्मक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाला केली होती. 

यूएईमध्ये स्पुतनिक व्ही ९७% परिणामकारकसंयुक्त अरब अमिरातीत स्पुतनिक व्ही लस संसर्गावर ९७.८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा रशियन संस्थेने केला आहे. 

मागील ८७ दिवसांत सर्वात कमी मृत्यूंची नोंद 

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनामुळे ८१७ जण मरण पावले असून हा मागील ८७ दिवसांतला सर्वात कमी आकडा आहे. तसेच ४५ हजारांहून जास्त नवे रुग्ण सापडले असून ६० हजार लोक बरे झाले. सलग ४८व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण जास्त होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार