शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

सरकारला राज्यसभेत यंदाही बहुमत गाठणे कठीण, पाच राज्ये गमावल्याने पुरेसे संख्याबळ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 04:36 IST

पाच वर्षे राज्यसभेतील बहुमताशिवाय सत्ता राबवाव्या लागलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) सन २०२० या नव्या वर्षांतही संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणाार नाही, अशी चिन्हे आहेत.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात संपूर्ण पाच वर्षे राज्यसभेतील बहुमताशिवाय सत्ता राबवाव्या लागलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) सन २०२० या नव्या वर्षांतही संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणाार नाही, अशी चिन्हे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्वीपेक्षाही अधिक बहुमताने दिल्लीत सत्तेत आलेल्या ‘रालोआ’ने आणि प्रामुख्याने त्यातील भाजप या सर्वात मोठ्या पक्षाने त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणकांमध्ये पाच राज्ये गमावणे हे याचे प्रमुख कारण आहे. विशेषत: महाराष्ट्र व हरियाणात आधीपेक्षा कमी आमदार निवडून आल्याने भाजपाचे राज्यसभेतील बहुमताचे गणित बिघडले आहे. राज्यसभेची निवडणूक राज्य विधानसभांमधून होत असते.राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांपैकी १० जागा उत्तर प्रदेशातील असतील. छत्तीसगढ, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातील सत्ता गमावल्याचा फटका भाजपाला तेथील राज्यसभा निवडणुकीत नक्कीच बसेल. हरियाणात भाजपाने सत्ता कायम राखली असली तरी त्यांच्या आमदारांची संख्या तेथे ४७ वरून ४० वर आली आहे. तीच स्थिती महाराष्ट्रात आहे. यावेळी त्यांचे विधानसभेत गेल्यावेळच्या १३९ पेक्षा १७ कमी म्हणजे १२२ आमदार निवडून आले आहेत.>आगामी वर्षात अनेक सदस्य होणार निवृत्तराज्यसभेच्या चार जागा आधीपासूनच रिक्त आहेत. त्यात आगामी वर्षात सदस्यांच्या निवृत्तीने आणखी ६९ जागांची भर पडणार आहे. निवृत्त होणाºया सदस्यांपैकी १० भाजपाचे तर १७ काँग्रेसचे आहेत. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत भाजपाचे सध्या ८३, काँग्रेसचे ४६ सदस्य आहेत. विविध राज्य विधानसभांमधील पक्षीय संख्याबळ पाहता रिक्त जागांसाठी होणाºया निवडणुकांनंतरही भाजपाची संख्या सध्यापेक्षा फार वाढेल असे दिसत नाही.