शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा लोकसभेत गाजला, अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरले; राजीनाम्याची मागणी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:47 IST

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला.

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. महाकुंभ दररोज नवीन बातम्या समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज लोकसभेत या मुद्द्यावरुन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केले. चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरुन खासदार यादव यांनी योगी सरकारला घेरले आहे.

BMC Budget 2025: मुंबई Eye प्रोजेक्ट, फाइव्ह स्टार हॉटेल अन् बरंच काही... मुंबईचं ७४ हजार कोटींचं 'श्रीमंत' बजेट सादर!

महाकुंभातील चेंगराचेंगरी आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर करण्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी लोकसभेत भाजप सरकारवर हल्लाबोल केला. यादव म्हणाले की, मला वृत्तवाहिनीवरून कळले की महाकुंभात १०० कोटी लोकांच्या आगमनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मग हा अपघात कसा झाला?, असा सवालही त्यांनी केली. जर हे चुकीचे असेल तर मी तुम्हाला माझा राजीनामा देऊ इच्छितो, असंही ते म्हणाले. 

खासदार अखिलेश यादव म्हणाले, "सरकार सातत्याने अर्थसंकल्पीय आकडेवारी देत ​​आहे. आकडेवारी देण्यापूर्वी, महाकुंभात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारीही द्यावी. या घटनेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अखिलेश म्हणाले की, महाकुंभ आपत्ती व्यवस्थापन आणि हरवलेले आणि सापडलेले या केंद्राची जबाबदारी लष्कराकडे सोपवावी. महाकुंभ घटनेतील मृतांची आकडेवारी, जखमींवर उपचार, औषधे, डॉक्टर, अन्न, पाणी आणि वाहतुकीच्या उपलब्धतेची आकडेवारी संसदेत मांडली पाहिजे, असंही यादव म्हणाले.

'कठोर कारवाई केली पाहिजे'

महाकुंभ दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली पाहिजे आणि सत्य लपवणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असंही अखिलेश यादव म्हणाले. जर चूक नव्हती तर आकडे का दाबले, लपवले का?, असा सवालही त्यांनी केला. 

अखिलेश यादव म्हणाले, या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती मिळाली, मृतदेह शवागारात आणि रुग्णालयात पडले आहेत, तेव्हा सरकारने त्यांचे हेलिकॉप्टर फुलांनी भरले आणि त्यांच्यावर फुले वर्षाव केली. ही कसली सनातनी परंपरा आहे? देवालाच माहिती." "किती लोकांचा मृत्यू झाला आहे?" चप्पल, कपडे आणि साड्या आजूबाजूला पडल्या होत्या आणि त्या सर्व जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर ट्रॉलींनी उचलल्या होत्या. त्या कुठे फेकल्या हे कोणालाही माहिती नाही. सर्व काही लपविण्यासाठी, असे ऐकू येत आहे की काही दबाव जेणेकरून त्यांच्या बातम्या बाहेर येऊ नयेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabhaलोकसभा