शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा लोकसभेत गाजला, अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरले; राजीनाम्याची मागणी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:47 IST

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला.

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. महाकुंभ दररोज नवीन बातम्या समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज लोकसभेत या मुद्द्यावरुन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केले. चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरुन खासदार यादव यांनी योगी सरकारला घेरले आहे.

BMC Budget 2025: मुंबई Eye प्रोजेक्ट, फाइव्ह स्टार हॉटेल अन् बरंच काही... मुंबईचं ७४ हजार कोटींचं 'श्रीमंत' बजेट सादर!

महाकुंभातील चेंगराचेंगरी आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर करण्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी लोकसभेत भाजप सरकारवर हल्लाबोल केला. यादव म्हणाले की, मला वृत्तवाहिनीवरून कळले की महाकुंभात १०० कोटी लोकांच्या आगमनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मग हा अपघात कसा झाला?, असा सवालही त्यांनी केली. जर हे चुकीचे असेल तर मी तुम्हाला माझा राजीनामा देऊ इच्छितो, असंही ते म्हणाले. 

खासदार अखिलेश यादव म्हणाले, "सरकार सातत्याने अर्थसंकल्पीय आकडेवारी देत ​​आहे. आकडेवारी देण्यापूर्वी, महाकुंभात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारीही द्यावी. या घटनेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अखिलेश म्हणाले की, महाकुंभ आपत्ती व्यवस्थापन आणि हरवलेले आणि सापडलेले या केंद्राची जबाबदारी लष्कराकडे सोपवावी. महाकुंभ घटनेतील मृतांची आकडेवारी, जखमींवर उपचार, औषधे, डॉक्टर, अन्न, पाणी आणि वाहतुकीच्या उपलब्धतेची आकडेवारी संसदेत मांडली पाहिजे, असंही यादव म्हणाले.

'कठोर कारवाई केली पाहिजे'

महाकुंभ दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली पाहिजे आणि सत्य लपवणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असंही अखिलेश यादव म्हणाले. जर चूक नव्हती तर आकडे का दाबले, लपवले का?, असा सवालही त्यांनी केला. 

अखिलेश यादव म्हणाले, या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती मिळाली, मृतदेह शवागारात आणि रुग्णालयात पडले आहेत, तेव्हा सरकारने त्यांचे हेलिकॉप्टर फुलांनी भरले आणि त्यांच्यावर फुले वर्षाव केली. ही कसली सनातनी परंपरा आहे? देवालाच माहिती." "किती लोकांचा मृत्यू झाला आहे?" चप्पल, कपडे आणि साड्या आजूबाजूला पडल्या होत्या आणि त्या सर्व जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर ट्रॉलींनी उचलल्या होत्या. त्या कुठे फेकल्या हे कोणालाही माहिती नाही. सर्व काही लपविण्यासाठी, असे ऐकू येत आहे की काही दबाव जेणेकरून त्यांच्या बातम्या बाहेर येऊ नयेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabhaलोकसभा