शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस, विरोधकांचा एल्गार, नायडूंकडे ७१ जणांच्या स्वाक्षरीचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 05:44 IST

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पदावरून दूर करण्यासाठी त्यांच्यावर महाभियोग चालवला जावा, अशी नोटीस काँग्रेससह सात विरोधी पक्षांनी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना दिली.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पदावरून दूर करण्यासाठी त्यांच्यावर महाभियोग चालवला जावा, अशी नोटीस काँग्रेससह सात विरोधी पक्षांनी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना दिली. या नोटिसीवर ७१ खासदारांची स्वाक्षरी असून त्यातील सात खासदार हे आता राज्यसभा सदस्य नसल्याने ६४ खासदारांची स्वाक्षरीच मान्य केली जाईल.महाभियोगाची नोटीस पहिल्याच टप्प्यावर सभापती नायडू फेटाळू शकतात. त्यांना तो अधिकार आहे. या महाभियोग नोटीसमध्ये मिश्रा यांच्या वर्तनाचा आधार घेत पाच गंभीर आरोप केले गेले आहेत. महाभियोगावरून विरोधी पक्षांत मतभेद आहेत. त्यामुळे नोटिसीवर द्रमुक, तृणमूल काँग्रेस व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, अभिषेक मनू सिंघवी यांची सही नाही.गुलाम नबी आझाद म्हणाले की, तृणमूल व द्रमुकच्या सह्या नसल्या तरी ते आमच्यासोबत आहेत. मनमोहन सिंग यांना पदाची प्रतिष्ठा अबाधित राहण्यासाठी दूर ठेवले आहे.हे अतिशय दुर्दैवीमहाभियोग चालविण्याबाबत लोकप्रतिनिधींसह अन्य लोकांनी सार्वजनिक विधाने केल्याचे प्रकरण अतिशय दुर्दैवी असल्याचे मत न्यायमूर्ती ए. के. सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी व्यक्त केले आहे.भाजपाने उघडली आघाडीमहाभियोगाचे प्रयत्न सुरू होताच मोदी सरकार व भाजपाने काँग्रेसविरोधात आघाडीच उघडली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ब्लॉगवर काँग्रेसवर हल्ला केला. काँग्रेस महाभियोगाचा वापर राजकीय शस्त्रासारखा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सात पक्षांनी सरन्यायाधीशांना धमकावण्यासाठी महाभियोगाचे शस्त्र हाती घेतले आहे, असे जेटली म्हणाले. मीनाक्षी लेखी यांनी तर काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे हे पाऊल उचलल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले.काय आहेत मुद्देविरोधकांनी जे मुद्दे घेतले आहेत, त्यात मास्टर आॅफ रोस्टरच्या भूमिकेचा दुरुपयोग, खटले ठरावीक न्यायाधीशांकडे सोपवणे, प्रसाद एज्युकेशन ट्रस्टवरून सरन्यायाधीशांवर झालेले आरोप यांचा समावेश आहे.ओडिशा उच्च न्यायालयातील एक निवृत्त न्यायाधीश व दलाल यांच्यात लाचेवरून झालेली चर्चा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. नारायण शुक्ला यांच्याविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल करण्यासनकार देणे हेही उल्लेख त्यात आहेत. दीपक मिश्रा वकिली करीत होतेतेव्हा त्यांनी जमीन घोटाळा करूनतो लपवला या आरोपाचाही विरोधकांनी उल्लेख केला.विरोधकांच्या नोटिसीचा मुख्य आधार दीपक मिश्रा यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आहे. त्यात न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूबद्दल चार न्यायमूर्तींनी व्यक्त केलेल्या काळजीचाही उल्लेख आहे.दुसरा पर्यायच नव्हतान्यायपालिकेबद्दल संशय असेल तर लोकशाही सुरक्षित कशी राहील? आमच्याकडे महाभियोगाखेरीज पर्यायच नव्हता. प्रश्न आम्ही उपस्थित केलेले नसून, सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी चिंता जाहीर केलेली आहे.- कपिल सिब्बल, काँग्रेसचे नेते

टॅग्स :Deepak Mishraदीपक मिश्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालय