शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

ISRO चे यान थेट सूर्याकडे झेपावणार; या दिवशी सुरू होणार ‘मिशन सूर्य’, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 20:50 IST

इस्रो चंद्रयान-3 च्या यशानंतर सूर्याच्या दिशेने आदित्य एल-1 यान पाठवणार आहे. सूर्याचा अभ्यास का महत्वाचा, जाणून घ्या...

ISRO Chandrayaan 3:भारताने आज इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवणारा भारत पहिला देश बनला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी(इस्रो) चंद्रयान-3 मोहीम अत्यंत गुंतागुंतीची होती. दोन दिवसांपूर्वीच रशियाचे यान कोसळल्यानंतर भारतापुढे सुरक्षित यान उतरवण्याचे मोठे आव्हान होते. पण, इस्रो शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे चीज झाले अन् विक्रम लँडर सुरक्षिततरित्या चंद्रावर उतरले. या मोहिमेनंतर इस्रो आणखी एक मोठी आव्हानात्मक मोहीम राबवणार आहे.

इस्रो ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला आदित्य एल-1 मिशन लॉन्च करणार आहे. इस्रोचे हे आतापर्यंतचे सर्वात अवघड मिशन असणार आहे. एल-1 मिशनद्वारे इस्रोचे या थेट सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेद्वारे भारत प्रथमच सौर यंत्रणेत 'स्पेस ऑब्झर्व्हेटरी' तैनात करणार आहे. आदित्य एल-1 अंतराळयान सूर्यावर लक्ष ठेवण्याचे काम करेल. या काळात हे यान सूर्यावर घडणाऱ्या विविध घटनांची माहिती इस्रोला देईल.

लॅग्रेंज पॉईंटपर्यंत यान पाठवले जाईलभारताने आजपर्यंत लॅग्रेंज पॉईंटपर्यंत अंतराळयान पाठवलेले नाही. लॅग्रेंज पॉइंट हा अंतराळातील दोन किंवा अधिक मोठ्या वस्तूंमधील एक बिंदू आहे (जसे की सूर्य आणि पृथ्वी दरम्यानची पोकळी). येथे एखादे अवकाशयान पाठवले तर ते दोन महाकाय वस्तूंच्या गुरुत्वाकर्षणामुळे एकाच जागी स्थिर राहते. आदित्य अंतराळयान पृथ्वीपासून 15 लाख किमी दूर पाठवले जाईल. या टप्प्यावर अंतराळयान स्थिर ठेवणे फार कठीण काम आहे.

या उपकरणांच्या सहाय्याने सूर्याचा अभ्यास होणारपृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पाच लॅग्रेंज बिंदू आहेत, ज्यामध्ये आदित्यला लॅग्रेंज-1 वर पाठवले जाईल. आदित्य L-1 अंतराळयानामध्ये SUIT आणि VELC अशी दोन मोठी उपकरणे असतील. हे भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक मापन VELC द्वारे केले जाईल. सोप्या भाषेत सांगायचे तर या यंत्राद्वारे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

सूर्याचा अभ्यास का आवश्यक आहे?आदित्य एल-1 अंतराळयान हे अवकाश दुर्बिणीसारखे असेल. या मिशनची दोन मुख्य कार्ये आहेत. पहिले म्हणजे सूर्याचा दीर्घकाळ शास्त्रीय अभ्यास करणे आणि दुसरे म्हणजे आपले उपग्रह वाचवणे. सूर्यापासून रेडिएशन आणि सौर वादळांचा धोका आहे. त्यामुळे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असलेल्या उपग्रहांचे नुकसान होते. एवढेच नाही तर सौर वादळामुळे विद्युत ग्रीडमध्ये बिघाड होतो.

सूर्यापासून सौर वादळांचा धोका तर आहेच, पण त्यामुळे होणारे कोरोनल मास इजेक्शन आणि सौर फ्लेअर्सही पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतात. हे रेडिओ कम्युनिकेशन खराब करू शकतात. अंतराळातील अंतराळवीरांनाही त्याच्याकडून इजा होऊ शकते. आदित्य एल-1 अंतराळयानाचे काम सूर्यप्रकाशात होणाऱ्या या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे आहे. एक प्रकारे, हे एक चेतावणी प्रणाली म्हणून काम करेल.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3Indiaभारतscienceविज्ञान