शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ISRO चे यान थेट सूर्याकडे झेपावणार; या दिवशी सुरू होणार ‘मिशन सूर्य’, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 20:50 IST

इस्रो चंद्रयान-3 च्या यशानंतर सूर्याच्या दिशेने आदित्य एल-1 यान पाठवणार आहे. सूर्याचा अभ्यास का महत्वाचा, जाणून घ्या...

ISRO Chandrayaan 3:भारताने आज इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवणारा भारत पहिला देश बनला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी(इस्रो) चंद्रयान-3 मोहीम अत्यंत गुंतागुंतीची होती. दोन दिवसांपूर्वीच रशियाचे यान कोसळल्यानंतर भारतापुढे सुरक्षित यान उतरवण्याचे मोठे आव्हान होते. पण, इस्रो शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे चीज झाले अन् विक्रम लँडर सुरक्षिततरित्या चंद्रावर उतरले. या मोहिमेनंतर इस्रो आणखी एक मोठी आव्हानात्मक मोहीम राबवणार आहे.

इस्रो ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला आदित्य एल-1 मिशन लॉन्च करणार आहे. इस्रोचे हे आतापर्यंतचे सर्वात अवघड मिशन असणार आहे. एल-1 मिशनद्वारे इस्रोचे या थेट सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेद्वारे भारत प्रथमच सौर यंत्रणेत 'स्पेस ऑब्झर्व्हेटरी' तैनात करणार आहे. आदित्य एल-1 अंतराळयान सूर्यावर लक्ष ठेवण्याचे काम करेल. या काळात हे यान सूर्यावर घडणाऱ्या विविध घटनांची माहिती इस्रोला देईल.

लॅग्रेंज पॉईंटपर्यंत यान पाठवले जाईलभारताने आजपर्यंत लॅग्रेंज पॉईंटपर्यंत अंतराळयान पाठवलेले नाही. लॅग्रेंज पॉइंट हा अंतराळातील दोन किंवा अधिक मोठ्या वस्तूंमधील एक बिंदू आहे (जसे की सूर्य आणि पृथ्वी दरम्यानची पोकळी). येथे एखादे अवकाशयान पाठवले तर ते दोन महाकाय वस्तूंच्या गुरुत्वाकर्षणामुळे एकाच जागी स्थिर राहते. आदित्य अंतराळयान पृथ्वीपासून 15 लाख किमी दूर पाठवले जाईल. या टप्प्यावर अंतराळयान स्थिर ठेवणे फार कठीण काम आहे.

या उपकरणांच्या सहाय्याने सूर्याचा अभ्यास होणारपृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पाच लॅग्रेंज बिंदू आहेत, ज्यामध्ये आदित्यला लॅग्रेंज-1 वर पाठवले जाईल. आदित्य L-1 अंतराळयानामध्ये SUIT आणि VELC अशी दोन मोठी उपकरणे असतील. हे भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक मापन VELC द्वारे केले जाईल. सोप्या भाषेत सांगायचे तर या यंत्राद्वारे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

सूर्याचा अभ्यास का आवश्यक आहे?आदित्य एल-1 अंतराळयान हे अवकाश दुर्बिणीसारखे असेल. या मिशनची दोन मुख्य कार्ये आहेत. पहिले म्हणजे सूर्याचा दीर्घकाळ शास्त्रीय अभ्यास करणे आणि दुसरे म्हणजे आपले उपग्रह वाचवणे. सूर्यापासून रेडिएशन आणि सौर वादळांचा धोका आहे. त्यामुळे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असलेल्या उपग्रहांचे नुकसान होते. एवढेच नाही तर सौर वादळामुळे विद्युत ग्रीडमध्ये बिघाड होतो.

सूर्यापासून सौर वादळांचा धोका तर आहेच, पण त्यामुळे होणारे कोरोनल मास इजेक्शन आणि सौर फ्लेअर्सही पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतात. हे रेडिओ कम्युनिकेशन खराब करू शकतात. अंतराळातील अंतराळवीरांनाही त्याच्याकडून इजा होऊ शकते. आदित्य एल-1 अंतराळयानाचे काम सूर्यप्रकाशात होणाऱ्या या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे आहे. एक प्रकारे, हे एक चेतावणी प्रणाली म्हणून काम करेल.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3Indiaभारतscienceविज्ञान